शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

खासगी वीज स्वस्त झाल्याने सात वीजसंच बंद

By admin | Updated: July 8, 2016 05:03 IST

राज्यातील विजेची मागणी सुमारे पाच हजार मेगावॅटने कमी झाल्याने आणि बाजारात खासगी कंपन्यांची वीज तुलनेने स्वस्त उपलब्ध असल्याने ‘महानिर्मिती’चे सात औष्णिक वीजनिर्मिती

- कमल शर्मा,  नागपूर

राज्यातील विजेची मागणी सुमारे पाच हजार मेगावॅटने कमी झाल्याने आणि बाजारात खासगी कंपन्यांची वीज तुलनेने स्वस्त उपलब्ध असल्याने ‘महानिर्मिती’चे सात औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्यात आले आहेत. महागडे सरकारी वीजसंच बंद ठेवून स्वस्त खासगी वीज खरेदीने राज्याची विजेची गरज भागविण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार कोराडी औष्णिक वीज केंद्रातील संच क्र. ५ व ७, भुसावळ औष्णिक वीजकेंद्रातील संच क्र. २, ४ व ५ आणि खापरखेडा येथील संच क्र. २ व ३ बंद ठेवण्यात येत आहेत. या तीनही वीजनिर्मिती केंद्रांना या संचांचे ‘झीरो शेड्युलिंग’ करण्याचे म्हणजेच ते बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी या केंद्रांना पाठविलेले ‘एसएमएस’ संदेश ‘लोकमत’कडे उपलब्ध आहेत.संबंधित तिन्ही युनिट बंद करण्यासाठी देखभाल दुरुस्ती हे कारण दिले जात आहे. प्रत्यक्षात मात्र मागणी कमी व विजेची उपलब्धता जास्त असल्यामुळे संच बंद ठेवण्यात येत आहेत. बंद करण्यात आलेले हे सातही वीजनिर्मिती संच जुने आहेत व त्यांचा उत्पादन दर जास्त आहे. खासगी क्षेत्रातून स्वस्त वीज उपलब्ध होत असताना शासकीय वीज केंद्रातून मिळत असलेली महागडी वीज का खरेदी करायची, असे महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र आता भारनियमनातून बराचसा बाहेर आला आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्या सक्रिय झाल्याने आणि नवीन सरकारी वीज संच सुरू झाल्याने मागणी आणि पुरवठा यातील अंतर जवळपास संपले आहे. मागील आठवड्यात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पाच हजार मेगावॅट विजेची मागणी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात एकूण १७,५०० मेगावॅट विजेची मागणी होती. परंतु गुरुवारी ही मागणी घटून १२,५८९ मेगावॅट झाली आहे. मागील आठवड्यापर्यंत राज्यात एकूण17,500मेगावॅट विजेची मागणी होती. परंतु गुरुवारी ही मागणी घटून12,589मेगावॅट झाली.बदललेल्या परिस्थितीचे चित्रशासकीय व खासगी क्षेत्रातील वीज उत्पादनाच्या दराची तुलना केली असता चित्र स्पष्ट होते. पॉवर एक्स्चेंजमध्ये सुमारे तीन रुपये प्रति युनिट दराने वीज उपलब्ध आहे.अदानीच्या नव्या युनिटमध्येही ३.६८ रुपये दराने वीज मिळत आहे. दुसरीकडे शासकीय वीज केंद्रांचा उत्पादन दर ५.७५ रुपयांपर्यंत जात आहे. बहुतांश शासकीय केंद्रांचा उत्पादन दर तीन ते चार रुपयांच्या दरम्यान आहे.