शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

केबल कार कोसळून नागपूरच्या चौघांसह सात जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 26, 2017 01:46 IST

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गुलमर्ग येथे रविवारी केबल कार तुटून सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नागपुरातील

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीनगर / नागपूर : उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गुलमर्ग येथे रविवारी केबल कार तुटून सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नागपुरातील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. हे वृत्त सायंकाळी नागपुरात आल्यानंतर जुना सुभेदार ले-आऊट परिसरात तीव्र शोककळा पसरली. गुलमर्ग आणि गोंडोला दरम्यान पर्यटकांची ने-आण करण्यासाठी तारेवर चालणारी केबल कार बसविलेली आहे. या कारमध्ये नागपुरातील जयंत अंड्रसकर (४२), त्यांची पत्नी मनिषा (४०) तसेच अनघा (५) आणि जान्हवी (७) या दोन मुलींसह त्यांचे गाईड बसले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून केबल कारच्या तारेवर पडले व त्या वजनाने तार तुटली. तार तुटल्याने तिच्यावरून पुढे सरकणारी केबल कारही दरीत कोसळली. जयंत अंड्रसकर मूळचे नागपूरचे असून, सात वर्षांपासून ते दिल्लीत स्थायिक झाले होते. त्यांचे वृद्ध आईवडील, भाऊ आणि विवाहित बहीण नागपुरातच राहते. ओळख पटलेला आणखी एक मृतदेह मुख्तार अहमद या स्थानिक नागरिकाचा असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या तारेवरून एकावेळी चार केबल कार ये-जा करत असतात व त्यांचा प्रवास परस्परांच्या संतुलनावर अवलंबून असतो. झाडामुळे एक केबल कार खाली पडल्याने इतर तीन केबल कारही उंचावर लटकत जागीच अडकल्या. त्यातील लोकांना सुखरूपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न काळोख पडेपर्यंत सुरू होते.गोंडोला राइड गुलमर्ग-गोंडोला रोप-वे प्रवाशांना व सामानाला समुद्रसपाटीपासून १३,७८० फूट उंचीपर्यंत घेऊन जातो. तासाला ६०० प्रवाशांची ने-आण करण्याची त्याची क्षमता आहे.