शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

सातजणांना मिळाले अपघातग्रस्त युवकाच्या अवयवदानामुळे जीवनदान

By admin | Updated: March 9, 2015 23:56 IST

आई-वडिलांनीसुद्धा पंडित याच्या अवयवदानास तयारी दर्शविली. याचा परिणाम म्हणून पंडित याचे हृदय तातडीने विमानाने हैदराबाद येथे नेण्यात आले.

इचलकरंजी : अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या आणि मृत्यूच्या दारात असलेल्या युवकाचे हृदय, यकृत महत्त्वाचे अवयव दान करून सातजणांना जीवनदान देण्याचे दातृत्व माता-पित्यांनी दाखविल्याची दुर्मीळ घटना बंगलोर येथे घडली. अपघातग्रस्त युवक हा येथील कामगार नेते शिवानंद पाटील यांचा भाचा असल्याने त्या युवकाच्या माता-पित्यांचे मन तयार करण्याचे मोठे काम पाटील यांनी केले.शिवानंद पाटील हे येथील एका कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सदलापूर (जि. सोलापूर) येथील भाचा पंडित शिवराय बजे (वय २८) हा बंगलोर येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता. तो कामावरून परतत असताना मागील बाजूने त्याला एका भरधाव बसने धडक दिली. त्यामध्ये तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला बंगलोर येथील व्हिक्टोरिया रुग्णालयाध्ये दाखल केले होते; पण पंडित याच्या डोक्याला मोठा आघात झाल्यामुळे त्याचा मेंदू निकामी झाला होता; मात्र शरीराचे अन्य सर्व अवयव चांगले होते.अपघाताची माहिती समजताच पंडित बजे याचे माता-पिता आणि कामगार नेते शिवानंद पाटील हे तातडीने बंगलोरला गेले. पाटील यांनी येथील प्रमुख डॉक्टरांशी चर्चा केली. त्यावेळी पंडित हा मृत्यूच्या दारात असून, त्याला निव्वळ कृत्रिम श्वासोच्छ्वासावर जिवंत ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच पंडित याचे हृदय, यकृत, मूत्रपिंड असे अवयव दान केल्यास गंभीररीत्या आजारी असलेल्या अन्य रुग्णांना जीवनदान मिळेल, असा सल्ला रुग्णालयाच्यावतीने देण्यात आला. तेव्हा पाटील यांनी पंडित याचे माता-पिता सुशीला शिवराय बजे व शिवराय बळवंत बजे यांना वस्तुस्थिती समजावून सांगून अवयव दान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण काम पार पाडले. आई-वडिलांनीसुद्धा पंडित याच्या अवयवदानास तयारी दर्शविली. याचा परिणाम म्हणून पंडित याचे हृदय तातडीने विमानाने हैदराबाद येथे नेण्यात आले. तेथील यशोदा हॉस्पिटलमध्ये असलेल्या एका रुग्णास हे हृदय बसवून जीवनदान देण्यात आले, तर बंगलोर येथीलच सेंट जॉर्ज मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील एका रुग्णावर मूत्रपिंडाचे रोपण करण्यात आले. अशा प्रकारे हैदराबाद येथील एका, तर बंगलोर येथील सहा रुग्णांना वेगवेगळे अवयव बसवून त्यांना जीवनदान देण्यात आले. त्यामुळे पंडित याचे माता-पिता सुशीला व शिवराय यांच्या आदर्श कार्याची प्रचिती या रुग्णांना आली आणि त्यानिमित्ताने त्यांच्या अपघातग्रस्त मुलाच्याही स्मृती चिरंतर राहिल्या, याची चर्चा येथे आहे. (प्रतिनिधी)