शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताचे आणखी सात बळी

By admin | Updated: June 9, 2014 01:15 IST

विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी विदर्भात आणखी सात जणांचा उष्माघाताने बळी झाला. यात नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.

विदर्भात सूर्याचे आग ओकणे सुरुच : नागपूर ४७.३ अंशावरनागपूर/अमरावती/चंद्रपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी विदर्भात आणखी सात जणांचा उष्माघाताने बळी झाला. यात नागपूर,  अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. गेल्या ४८ तासांतील उष्माघाताच्या बळींची संख्या २२ वर पोहोचली आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक ४७.३, वर्धा ४७.३ आणि गोंदिया येथे ४७.१ अंशापर्यंत पारा पोहोचला होता. विदर्भात उर्वरित जिल्ह्यात पारा उच्चांकावर आहे.  रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर उष्माघातामुळे दोघांचा बळी गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुपारी ३.२0  वाजता एका अनोळखी महिलेचा मृतदेह नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात असलेल्या बुकिंग कार्यालयाच्या गेटजवळ पडून असल्याची बाब  उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना सांगितली. संबंधित महिलेचे वय ६५ वर्ष असून रंग सावळा, उंची ५ फूट ३ इंच आहे.१२७२४ एपी एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी १0.३0 वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. या गाडीच्या शौचालयाजवळ एका ६0  वर्षाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह पडून होता. संबंधित इसमाची उंची ५ फूट १0 इंच दोन्ही मृतदेह लोहमार्ग पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मेयो  रुग्णालयात पाठविले आहेत. अमरावती जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दर्यापूर व धामणगाव तालुक्यात घडली. धामणगाव रेल्वे  तालुक्यात निंभोरा (बोडखा) येथील ज्ञानेश्‍वर नवृत्ती बढीये (४८) व दर्यापूर तालुक्यात आमला येथील पूनम संदीप महात्मे (२२) अशी मृतांची  नावे आहे.निंभोरा बोडखा येथील ज्ञानेश्‍वर बढीये हे रविवारी सकाळी शेतात कामाला गेले होते. कडक उन्हाने जीवाची काहिली होताना त्यांना पिण्यासाठी  पाणीही मिळाले नाही. पाणी पिण्यासाठी म्हणून ते दुपारी घराकडे येण्यासाठी निघाले. दरम्यान रस्त्यातच ते कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. दर्यापूर  तालुक्यात आमला येथील पूनम महात्मे यांना ऊन लागल्याने ताप आला. त्यांना दर्यापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इकडे वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलीस  स्टेशन अंतर्गत मांडवा (पोड) येथील एका महिलेचा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वाढोणा (बाजार) येथील एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. मांडवा (पोड) येथे विमला कृष्णा नाईक (६५) ही महिला शेतात काम करत असताना  शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उष्माघाताचा आघात  झाला. त्या आपल्या नातवंडासोबत शेतातील काडी-कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. शेतात असताना एकाएकी चक्कर येऊन त्या खाली पडल्या.  त्यांच्या नातवाने ही माहिती कुटुंबाला दिली. नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली असता महिलेचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. वाढोणा (बाजार) येथील अरुण पांडुरंग डंभारे (३६)  शनिवारी  येथील एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. दरम्यान, लगतच्या मंदिरात गेलेल्या नागरिकांना तो सायंकाळी ६ वाजता मृतावस्थेत आढळून आला.    चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील मायावतीनगर परिसरात राहणारे जनार्धन माणिक दुधे (७९) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना रविवारी  उघडकीस आली. जनार्धन दुधे घराच्या वरच्या माळ्यावरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. मात्र रविवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळले. (प्रतिनिधी)