शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

उष्माघाताचे आणखी सात बळी

By admin | Updated: June 9, 2014 01:15 IST

विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी विदर्भात आणखी सात जणांचा उष्माघाताने बळी झाला. यात नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.

विदर्भात सूर्याचे आग ओकणे सुरुच : नागपूर ४७.३ अंशावरनागपूर/अमरावती/चंद्रपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी विदर्भात आणखी सात जणांचा उष्माघाताने बळी झाला. यात नागपूर,  अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. गेल्या ४८ तासांतील उष्माघाताच्या बळींची संख्या २२ वर पोहोचली आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक ४७.३, वर्धा ४७.३ आणि गोंदिया येथे ४७.१ अंशापर्यंत पारा पोहोचला होता. विदर्भात उर्वरित जिल्ह्यात पारा उच्चांकावर आहे.  रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर उष्माघातामुळे दोघांचा बळी गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुपारी ३.२0  वाजता एका अनोळखी महिलेचा मृतदेह नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात असलेल्या बुकिंग कार्यालयाच्या गेटजवळ पडून असल्याची बाब  उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना सांगितली. संबंधित महिलेचे वय ६५ वर्ष असून रंग सावळा, उंची ५ फूट ३ इंच आहे.१२७२४ एपी एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी १0.३0 वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. या गाडीच्या शौचालयाजवळ एका ६0  वर्षाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह पडून होता. संबंधित इसमाची उंची ५ फूट १0 इंच दोन्ही मृतदेह लोहमार्ग पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मेयो  रुग्णालयात पाठविले आहेत. अमरावती जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दर्यापूर व धामणगाव तालुक्यात घडली. धामणगाव रेल्वे  तालुक्यात निंभोरा (बोडखा) येथील ज्ञानेश्‍वर नवृत्ती बढीये (४८) व दर्यापूर तालुक्यात आमला येथील पूनम संदीप महात्मे (२२) अशी मृतांची  नावे आहे.निंभोरा बोडखा येथील ज्ञानेश्‍वर बढीये हे रविवारी सकाळी शेतात कामाला गेले होते. कडक उन्हाने जीवाची काहिली होताना त्यांना पिण्यासाठी  पाणीही मिळाले नाही. पाणी पिण्यासाठी म्हणून ते दुपारी घराकडे येण्यासाठी निघाले. दरम्यान रस्त्यातच ते कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. दर्यापूर  तालुक्यात आमला येथील पूनम महात्मे यांना ऊन लागल्याने ताप आला. त्यांना दर्यापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इकडे वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलीस  स्टेशन अंतर्गत मांडवा (पोड) येथील एका महिलेचा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वाढोणा (बाजार) येथील एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. मांडवा (पोड) येथे विमला कृष्णा नाईक (६५) ही महिला शेतात काम करत असताना  शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उष्माघाताचा आघात  झाला. त्या आपल्या नातवंडासोबत शेतातील काडी-कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. शेतात असताना एकाएकी चक्कर येऊन त्या खाली पडल्या.  त्यांच्या नातवाने ही माहिती कुटुंबाला दिली. नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली असता महिलेचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. वाढोणा (बाजार) येथील अरुण पांडुरंग डंभारे (३६)  शनिवारी  येथील एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. दरम्यान, लगतच्या मंदिरात गेलेल्या नागरिकांना तो सायंकाळी ६ वाजता मृतावस्थेत आढळून आला.    चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील मायावतीनगर परिसरात राहणारे जनार्धन माणिक दुधे (७९) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना रविवारी  उघडकीस आली. जनार्धन दुधे घराच्या वरच्या माळ्यावरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. मात्र रविवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळले. (प्रतिनिधी)