शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

सातशे रुग्णांना मिळाले ‘जीवनामृत’

By admin | Updated: July 4, 2015 00:13 IST

रक्तदान श्रेष्ठ दान : ‘जीवन अमृत’ची सातारा व सिंधुदुर्गच्या यशानंतर राज्यात अंमलबजावणी

जावेद खान - सातारा -राज्य शासनाने सुरू केलेल्या जीवन अमृत सेवेच्या माध्यमातून या दीड वर्षामध्ये जवळपास सातशे रुग्णांना जीवदान मिळाले आहे. शासनाने रोडमॉडेल म्हणून सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून या सेवेला सुरुवात केली असली तरी रुग्णांच्या हितासाठी ही सेवा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे.खासगी नर्सिंग रुग्णांना तातडीने रक्त मिळत नाही. त्यासाठी त्यांना रक्तदात्याला शोधावे लागते किंवा रक्तपिढीत जाऊन रक्तगट शोधावे लागत होते. त्यामुळे कधी-कधी रुग्णांच्या जीवितासाठी धोका निर्माण होत होता. यासाठी शासनाने रोड मॉडेल म्हणून सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ही योजना प्रथम सुरू केली. या योजनेअंतर्गत टोल फ्री नंबर ‘१०४’ वर खासगी होम मधील ज्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. त्याना जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी मार्फत शीतसाखळीद्वारे रक्ताची पिशवी पोहोच केली जाते. या सेवेसाठी रुग्णालयामार्फत एका पिशवीसाठी ८५० रुपये व ५० रुपये सर्व्हिस चार्ज घेतला जातो. साताऱ्यापासून ४० किलोमीटर अंतरापर्यंत ही सेवा सध्या उपलब्ध असून, या सेवेद्वारे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. म्हणून येत्या काही कालावधीतच जिल्ह्यातील वाई, पाटण, फलटण, खंडाळा, वडूज या तालुक्यांतील ही सेवा सुरू करण्याचा शासकीय रुग्णालयांचा प्रस्ताव आहे. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. गतवर्षी जवळ पास ४७५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला तर सुरू वर्षी या सहा महिन्यात २११ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. महिन्याला जवळपास ६० ते ७० पिशव्यांची रुग्णालयांना गरज भासते. अशी मिळते रक्ताची पिशवी खासगी नर्सिंग होमद्वारे १०४ वर रक्ताची मागणी केल्यानंतर हा कॉल पुण्यातील लॅबमध्ये लागतो. ज्या परिसरातील मागणी आहे. त्या परिसरातील रुग्णालयास संपर्क साधून रक्त गटाची पिशवी घेऊन दुचाकी वाहनावरून संबंधित रुग्णालयापर्यंत पोहोचवली जाते. साधारण तासाभरातच रक्त मिळत असल्याने रुगणाची धावपळ वाचत आहे.अनेकांची फसगतही...खासगी नर्सिंगहोम मधून मागणी मिळताच रक्ताची पिशवी घेऊन संबंधित कार्मचारी रुग्णालयात हजर होतो. पण, बऱ्याच वेळा रक्ताची मागणी करणारे रुग्णच तेथे नसल्याने फसगतही होते.जीवन अमृत सेवेमुळे वेळेत हवा तो रक्तगट उपलब्ध होत आहे. अनेक वेळा रुग्णांना वेळेत रक्त मिळत नसल्याने जीवाला धोक्यात घालावे लागत आहे. परंतु या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवदानही मिळाले आहे. त्यामुळे ही सेवा संपूर्ण जिल्ह्यात सुरू करावी. जेणे करून गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.-विजय जाधव, रुग्ण