शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

वापरापेक्षा सातपट बाष्पीभवन

By admin | Updated: April 28, 2015 01:36 IST

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे.

औरंगाबाद : उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे. औरंगाबादसाठी जायकवाडीतून रोज ०.१५ दलघमी पाणी उचलले जाते. त्या तुलनेत बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जाणारे पाणी सातपट आहे. परिणामी, जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा अवघा ९.३५ टक्क्यांवर आला आहे. पैठण येथील जायकवाडी हे मराठवाड्यातील सर्वांत मोठे धरण आहे. औरंगाबाद व जालना शहरासह सुमारे ४०० लहान-मोठ्या गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. चार ते पाच औद्योगिक वसाहतींनाही जायकवाडीतून नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. तसेच मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी जायकवाडीवर अवलंबून आहे. सध्या जायकवाडीत अवघा ९.३५ टक्केच उपयुक्त साठा शिल्लक आहे. त्यात पुन्हा गेल्या तीन दिवसांपासून बाष्पीभवनाचे प्रमाण कित्येक पट्टींनी वाढले आहे. जलसंपदा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बाष्पीभवनाचे दररोजचे प्रमाण हे ०.४० ते ०. ५५ दलघमी होते; परंतु गेल्या तीन दिवसांत त्यात तीनपट वाढ झाली आहे. बाष्पीभवन थांबविणे शक्यजायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र पसरट भांड्यासारखे आहे. त्यामुळे इथे केमिकलद्वारे बाष्पीभवन थांबविणे तेवढे व्यवहार्य ठरणार नाही. त्याऐवजी सेकंडरी स्टोअरेजची कल्पना उपयोगी ठरू शकते. वाल्मीचे माजी महासंचालक सतीश भिंगारे यांनी खूप आधीच शासनाकडे ही कल्पना मांडलेली आहे. रबी हंगामापूर्वी जायकवाडीच्या उपयुक्त साठ्यातील पाणी दुसऱ्या स्वतंत्र खोलगट प्रकल्पात साठवायचे. तो प्रकल्प लहान आणि खोलगट असेल. जेणेकरून तिथे बाष्पीभवनाचे प्रमाण खूप कमी होईल, अशी माहिती जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिली.