शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

वापरापेक्षा सातपट बाष्पीभवन

By admin | Updated: April 28, 2015 01:36 IST

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे.

औरंगाबाद : उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे. औरंगाबादसाठी जायकवाडीतून रोज ०.१५ दलघमी पाणी उचलले जाते. त्या तुलनेत बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जाणारे पाणी सातपट आहे. परिणामी, जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा अवघा ९.३५ टक्क्यांवर आला आहे. पैठण येथील जायकवाडी हे मराठवाड्यातील सर्वांत मोठे धरण आहे. औरंगाबाद व जालना शहरासह सुमारे ४०० लहान-मोठ्या गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. चार ते पाच औद्योगिक वसाहतींनाही जायकवाडीतून नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. तसेच मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी जायकवाडीवर अवलंबून आहे. सध्या जायकवाडीत अवघा ९.३५ टक्केच उपयुक्त साठा शिल्लक आहे. त्यात पुन्हा गेल्या तीन दिवसांपासून बाष्पीभवनाचे प्रमाण कित्येक पट्टींनी वाढले आहे. जलसंपदा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बाष्पीभवनाचे दररोजचे प्रमाण हे ०.४० ते ०. ५५ दलघमी होते; परंतु गेल्या तीन दिवसांत त्यात तीनपट वाढ झाली आहे. बाष्पीभवन थांबविणे शक्यजायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र पसरट भांड्यासारखे आहे. त्यामुळे इथे केमिकलद्वारे बाष्पीभवन थांबविणे तेवढे व्यवहार्य ठरणार नाही. त्याऐवजी सेकंडरी स्टोअरेजची कल्पना उपयोगी ठरू शकते. वाल्मीचे माजी महासंचालक सतीश भिंगारे यांनी खूप आधीच शासनाकडे ही कल्पना मांडलेली आहे. रबी हंगामापूर्वी जायकवाडीच्या उपयुक्त साठ्यातील पाणी दुसऱ्या स्वतंत्र खोलगट प्रकल्पात साठवायचे. तो प्रकल्प लहान आणि खोलगट असेल. जेणेकरून तिथे बाष्पीभवनाचे प्रमाण खूप कमी होईल, अशी माहिती जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिली.