शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

वापरापेक्षा सातपट बाष्पीभवन

By admin | Updated: April 28, 2015 01:36 IST

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे.

औरंगाबाद : उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे. औरंगाबादसाठी जायकवाडीतून रोज ०.१५ दलघमी पाणी उचलले जाते. त्या तुलनेत बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जाणारे पाणी सातपट आहे. परिणामी, जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा अवघा ९.३५ टक्क्यांवर आला आहे. पैठण येथील जायकवाडी हे मराठवाड्यातील सर्वांत मोठे धरण आहे. औरंगाबाद व जालना शहरासह सुमारे ४०० लहान-मोठ्या गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. चार ते पाच औद्योगिक वसाहतींनाही जायकवाडीतून नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. तसेच मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी जायकवाडीवर अवलंबून आहे. सध्या जायकवाडीत अवघा ९.३५ टक्केच उपयुक्त साठा शिल्लक आहे. त्यात पुन्हा गेल्या तीन दिवसांपासून बाष्पीभवनाचे प्रमाण कित्येक पट्टींनी वाढले आहे. जलसंपदा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बाष्पीभवनाचे दररोजचे प्रमाण हे ०.४० ते ०. ५५ दलघमी होते; परंतु गेल्या तीन दिवसांत त्यात तीनपट वाढ झाली आहे. बाष्पीभवन थांबविणे शक्यजायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र पसरट भांड्यासारखे आहे. त्यामुळे इथे केमिकलद्वारे बाष्पीभवन थांबविणे तेवढे व्यवहार्य ठरणार नाही. त्याऐवजी सेकंडरी स्टोअरेजची कल्पना उपयोगी ठरू शकते. वाल्मीचे माजी महासंचालक सतीश भिंगारे यांनी खूप आधीच शासनाकडे ही कल्पना मांडलेली आहे. रबी हंगामापूर्वी जायकवाडीच्या उपयुक्त साठ्यातील पाणी दुसऱ्या स्वतंत्र खोलगट प्रकल्पात साठवायचे. तो प्रकल्प लहान आणि खोलगट असेल. जेणेकरून तिथे बाष्पीभवनाचे प्रमाण खूप कमी होईल, अशी माहिती जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिली.