शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुणे-नाशिक महामार्ग होता सात दिवस बंद

By admin | Updated: December 14, 2015 00:27 IST

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा पहिला लढा सुरू केला तो चाकणहून. आंदोलनाचे साक्षीदार व अटक झालेले तत्कालिन आमदार राम कांडगे म्हणाले

चाकण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा पहिला लढा सुरू केला तो चाकणहून. आंदोलनाचे साक्षीदार व अटक झालेले तत्कालिन आमदार राम कांडगे म्हणाले ‘‘जोशीसाहेबांनी ७ मार्च १९८० रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. कांदा पिकाला उत्पादनाच्या आधारे योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी ८ मार्च १९८० रोजी चाकणच्या मार्केट यार्ड मध्ये आमरण उपोषण सुरु केले. या वेळी बाजारात एक लाख कांदा पिशव्यांची आवक झाली होती. या उपोषणाला पुणे जिल्हा व परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चाकण परिसरातील बारा वाड्या व सर्व गावांतील शेतकऱ्यांनी प्रत्येक घरातील बैलगाडी आणून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशीपासून मंचर पर्यंत ४५ किलोमीटर रस्त्यावर चार ते पाच हजार बैलगाड्या मोकळ्या सोडून दिल्या. संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अनुकरण करून शिक्रापूर रस्ता, नगर रस्ता, तळेगाव रस्ता, पाबळ रस्ता व मावळातील रस्ते अडविले. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन हा रस्ता सात दिवस बंद झाला.या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात माजी आमदार रामभाऊ कांडगे, पंचायत समितीचे माजी सभापती स्व. वामनराव ठाकूर, बाजार समितीचे सभापती मारुतराव बारणे, आमदार सुरेश गोरे यांचे चुलते गुलाब गोरे, बाजार समितीचे माजी संचालक काळूराम भिकाजी कड यांच्यासह खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली व मावळ तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना अटक करून येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आंदोलनाला यश येऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. कांद्याला ४५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सर्व शेतकऱ्यांना १४ मार्चला येरवड्यामधून सोडले. १५ मार्च १९८० रोजी जोशी यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते उपोषण सोडले.