शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प!

By admin | Updated: September 25, 2014 01:31 IST

३० सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर यादरम्यान तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प राहील. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. बँकांचे दैनंदिन कार्य ८ आॅक्टोबरनंतरच सुरळीत होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांची गैरसोय : व्यवसायावर परिणाम होणारनागपूर : ३० सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर यादरम्यान तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प राहील. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. बँकांचे दैनंदिन कार्य ८ आॅक्टोबरनंतरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत बँकांचे कामकाज एवढे दिवस ठप्प राहण्याची पहिलीच वेळ आहे. ३० सप्टेंबर आणि १ आॅक्टोबरला बँकांचे अर्धवार्षिक क्लोजिंग असल्याने या दिवशी बँकांचे कामकाज होणार नाही. २ आॅक्टोबरला गांधीजयंती आहे. त्या दिवशी बँकांना सुटी असल्याने व्यवहार होणार नाहीत. ३ आॅक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँका बंद राहतील. ४ रोजी शनिवार असल्याने बँकांचे कामकाज अर्धा दिवसच राहील. याशिवाय ५ रोजी रविवार आणि सोमवार, ६ आॅक्टोबरला बकरी ईदनिमित्त पुन्हा बँकांना सुटी असल्याने कामकाज होणार नाही. तसे पाहता बकरी ईद रविवारीच आहे. पण बँकांनी ही सुटी सोमवारी जाहीर केली आहे. यानंतर प्रलंबित राहिलेल्या कामासाठी आणखी दोन दिवस लागतील. उपरोक्त सर्व दिवसांची गोळाबेरीज केल्यास ३० सप्टेंबर ते ७-८ आॅक्टोबरपर्यंत बँकांचे कामकाज होणार नाही. (प्रतिनिधी)