शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगली अर्बन बँकेचे सहा कोटी तुळजापुरात जप्त, निवडणूक पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 22:23 IST

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाने सांगली अर्बन बँकेचे सहा कोटी रुपये सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजापुरात जप्त केले

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 14 : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाने सांगली अर्बन बँकेचे सहा कोटी रुपये सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजापुरात जप्त केले. चौकशीत या पैशाबाबत बँकेच्या संबंधितांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने रात्री उशिरा ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. सदर अर्बन बँकेचे अध्यक्ष सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे बंधू गणेश गाडगीळ हे असल्याने या प्रकरणी संशय वाढला आहे.

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. असेच पथक सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजापूर बायपासवर वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी एक जीप (क्र. एमएच १०/ बीएम ३१२७) पथकापासून काही अंतरावर रेंगाळत असल्याचे निदर्शनास आल्याने पथकातील अधिकाऱ्यांना संशय आला. पथकाने सांगली अर्बन को-आॅप. बँक असे दर्शनी भागावर नाव असलेल्या जीपची तपासणी केली असता त्यामध्ये सहा सिमेंटच्या गोण्यांमध्ये एक हजार, पाचशेसह इतर रुपयांच्या नोटा भरल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती तातडीने पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना दिली. यावर पोलिसांनी घटनास्थळी येवून गाडी तसेच नोटांच्या गोण्यांचा पंचनामा केला व सदर जीप पोलिस ठाण्यात आणली.

जीपमधील पैशांची मोजणी करण्याकरिता शहरातील पतसंस्थांमधील नोटा मोजण्याच्या चार मशिन्स व कर्मचारी मागविण्यात आले व दुपारी तीनच्या सुमारास या नोटा मोजण्याचे काम सुरू झाले. यावेळी पोलिसांनी जीपसोबत असलेल्या व्यक्ती रवींद्र भोसले, माणिक सौंदडे आणि आळवेकर यांना विचारले असता त्यांनी आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच सदरची रक्कम परभणी व माजलगाव शाखेतील प्रत्येकी तीन कोटी रुपये इतकी असून, ही रक्कम बँकेच्या सांगली येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोन्ही शाखेचे लेटरपॅडवर लिहिलेले पत्रही पोलिसांकडे जमा केले. या पत्रावर माजलगाव शाखा येथील तीन कोटी रुपये आणि परभणी शाखेतील तीन कोटी याप्रमाणे नोटांचे विवरणपत्र आहे. अधिकारी म्हणतात, प्रकार संशयास्पदसहा कोटी ही रक्कम मोठी आहे. एवढी रक्कम वाहनातून नेताना बंदूकधारी सुरक्षारक्षक सोबत का घेतला नाही? तसेच निवडणूक कालावधीत बँकेच्या मुख्य कार्यालयात रक्कम जमा करायला जात असताना जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांचे लेखी परवानगीपत्र आवश्यक असते. याबरोबरच सदर रक्कम घेऊन जाताना बँकेतील वरिष्ठ अधिकारीही सोबत असणे गरजेचे असते. मात्र, या प्रकरणात या सर्व त्रुटी आढळल्याने हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद वाटतो, अशी प्रतिक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजीव बुबणे यांनी दिली. दरम्यान, सदर रक्कम उस्मानाबाद येथील कोषागार कार्यालयात जमा करतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागविले असून,बँकेच्या सांगली येथील प्रधान कार्यालयाकडे सदर नोटा पाठवित असल्यामुळे ती रक्कम परत देण्याची विनंती संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सदरील रक्कम संबंधित बँकेच्या ताब्यात द्यावी, किंवा कसे याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.

शंभराच्या नोटा सोबत कशासाठी ?निवडणूक कालावधी, त्यातच हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याचा शासनाचा निर्णय, यामुळे संबंधित अधिकारीही या प्रकरणाची आता कसून चौकशी करू लागले आहेत. माजलगाव शाखेतील तीन कोटी रुपयांच्या विवरणपत्रात ५०० रुपयांच्या ४८ हजार म्हणजेच २ कोटी ४० लाख रुपये व १०० रुपयांच्या साठ हजार म्हणजेच ६० लाख रुपये अशी तीन कोटींची रक्कम असल्याचे म्हटले आहे. तर परभणी शाखेतील पैशांचे विवरण देताना १ हजार रुपयांच्या दहा हजार नोटा म्हणजेच १ कोटी आणि ५०० रुपयांच्या ४० हजार नोटा म्हणजेच ३ कोटी रुपये अशीे एकूण सहा कोटी रुपयांची रक्कम असल्याचे बँकेने म्हटले आहे. हजार-पाचशेबरोबर सध्या मोठ्या प्रमाणावर तूट असलेल्या शंभर रुपयांच्या नोटा मुख्य शाखेत कशासाठी नेल्या जात होत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबरोबरच बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या राष्ट्रीयकृत मदर बँकेत रक्कम जमा करण्याऐवजी ती मुख्य बँकेत नेण्याचा अट्टाहास कशासाठी, असाही प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

सदर रक्कम कायदेशीर - गाडगीळसांगली अर्बन बँकेच्या बीड, माजलगाव, वसमत अशा मराठवाड्यातही शाखा आहेत. या शाखांमध्ये जुन्या नोटा साठल्या होत्या. तेथील शाखांनी इतर बँकांत कॅश भरणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या बँकांनी ती कॅश स्वीकारली नाही. त्यामुळे सांगली मुख्यालयातून वाहन, कर्मचारी व आवश्यक ती कागदपत्रे घेऊन सदर कॅश सांगलीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्मचारी व वाहन पाठविण्यात आले होते. या वाहनावर सुरक्षा रक्षक नव्हता. पोलिस बंदोबस्तासाठीही वेळ लागणार होता. शिवाय बँकेचे सुरक्षा रक्षक मुंबई शाखेतील कॅश आणण्यासाठी गेले होते. तुळजापूरमध्ये सापडलेली सर्व रक्कम ही सांगली अर्बन बँकेची कायदेशीर रक्कम आहे. आम्ही सर्वती कागदपत्रे सादर करणार आहोत, असे बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.