शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

सहा गावांचा सातबारा कोरा

By admin | Updated: July 2, 2016 01:51 IST

‘संपादनासाठी प्रस्तावित’ असल्याचे शिक्के राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे काढून टाकल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील ‘सेझ’च्या प्रस्तावित टप्प्यासाठी ६ गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर टाकलेले ‘संपादनासाठी प्रस्तावित’ असल्याचे शिक्के राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे काढून टाकल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे गुळाणी, भांबुरेवाडी, जऊळके खुर्द, गाडकवाडी, चिंचबाईवाडी, वाकळवाडी या गावांचा सातबारा कोरा झाला आहे. खेड तालुक्यात सेझ करताना पाच गावांमध्ये जमीन संपादन करून तो करण्यात आला. मात्र, त्या वेळी तालुक्यातील पूर, गोसासी, वाफगाव, वरुडे, गुळाणी, रेटवडी, चौधरवाडी, गाडकवाडी, चिंचबाईवाडी, वाकळवाडी इत्यादी १३ गावांतील जमिनींवर संपादनासाठी प्रस्तावित असे शिक्के मारून ठेवलेले होते. ते शिक्के काढावेत अशी मागणी अनेकदा आंदोलने करून शेतकऱ्यांनी केली होती. त्यासाठी खासदार आढळराव-पाटील आणि आमदार गोरे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यापैकी वरील ६ गावांचे १८६६ हेक्टर क्षेत्राचे सातबारे आता कोरे करण्यात आले आहेत. उर्वरित ७ गावांचे १६५७ हेक्टर क्षेत्रही पुढच्या टप्प्यात वगळण्यात येणार असून, त्याचाही शासननिर्णय लवकरच काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सेझच्या प्रस्तावित टप्प्यासाठी २००६ साली हे शिक्के मारून ठेवण्यात आले होते. ते काढावेत यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे वारंवार पाठपुरावा सुरू होता. उद्योगमंत्र्यांच्या दालनात २६ आॅगस्ट २०१५ रोजी बैठक घेण्यात आली होती. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यता दिली. शासन निर्णय क्र. २०१५/(५६६)/ उद्योग १४ दि. २९ जून २०१६ याद्वारे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आढळराव-पाटील आणि गोरे यांनी दिली. निर्णयात नमूद केलेले क्षेत्र औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक नाही, असे सरकारचे मत झाले आहे, असे निर्णय देताना म्हटले आहे. हे शिक्के काढण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर उद्योगमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षे पूर्वीच्या सरकारला आणि राज्यकर्त्यांना हा प्रश्न सोडविता आला नव्हता, तो आम्ही दोन वर्षांत सोडविला आहे. चाकण औद्योगिक टप्पा क्र. ५ साठीही शेतकऱ्यांनी स्वेच्छेने दिल्या तरच जमिनी घेणार; अन्यथा त्या वगळण्यात येतील, असे गोरे यांनी सांगितले. (वार्ताहर)।धरणग्रस्तांना प्रत्येकी १0 लाखभामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा निघाला असून त्यांना प्रत्येकी १० लाख आर्थिक मोबदला देण्यात येणार आहे. तसेच आळंदीसाठी पुण्याच्या पाणीयोजनेच्या कुरुळी येथील साठवण टाकीतून ५ एमएलडी पाणी उचलून पाणीयोजना करण्याचे ठरले. त्यासाठीची १० टक्के लोकवर्गणी पुणे मनपाने भरावी असे ठरले.