शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पैसे भरून तोडगा निघणार नाही

By admin | Updated: April 14, 2016 01:36 IST

आयपीएलचे सामने अन्यत्र हलवणे, हा राज्यातील पाणीटंचाईवर तोडगा असू शकत नाही, हे आम्हाला मान्य आहे. मात्र या सामन्यांसाठी वापरण्यात येणारे लाखो लिटर पाणी दुष्काळग्रस्त

मुंबई : आयपीएलचे सामने अन्यत्र हलवणे, हा राज्यातील पाणीटंचाईवर तोडगा असू शकत नाही, हे आम्हाला मान्य आहे. मात्र या सामन्यांसाठी वापरण्यात येणारे लाखो लिटर पाणी दुष्काळग्रस्त भागांना पुरवले तरी ही समस्या काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते. पैसे भरून हा तोडगा निघणार नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने आयपीएल आयोजकांना खडसावले. बुधवारच्या सुनावणीत बीसीसीआयतर्फे ज्येष्ठ वकील रफीक दादा यांनी बीसीसीआय मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ सहायता निधीमध्ये पाच कोटी रुपये देण्यास तयार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘एका सामन्यासाठी सरकारला मनोरंजन कर म्हणून दीड कोटी रुपये देण्यात येतात. त्यापेक्षा अधिक रक्कम बीसीसीआय मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ सहायता निधीमध्ये भरण्यास तयार आहे. तसा आदेश उच्च न्यायालयाने द्यावा. तर एमसीए आयपीएलच्या सामन्यांसाठी जेवढे पाणी खर्च करणार तेवढेच प्रक्रिया केलेले सांडपाणी दुष्काळी भागात मोफत देण्यास तयार आहे,’ असे अ‍ॅड. रफीक दादा यांनी खंडपीठाला सांगितले.आयपीएलचे सामने अन्यत्र हलवल्यास आर्थिक नुकसान होईल. आयपीएलमध्ये अनेक गुंतवणूकदारांचे व्यावसायिक हितसंबंध जोडले आहेत. तसेच आयत्यावेळी सामने अन्यत्र हलवण्यात येणे अशक्य आहे, असाही युक्तिवाद बीसीसीआय व एमसीएने खंडपीठापुढे केला.तर पुण्याच्या आयोजकांनी तिकीट विक्री झाली असून आता सामने अन्यत्र हलवले जाऊ शकत नाहीत, अशी भूमिका उच्च न्यायालयापुढे घेतली. संघाला पाठिंबा मिळणार नाही, असे पुण्यातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी खंडपीठाला सांगितले.त्यावर खंडपीठाने राज्य सरकारची यावर काय भूमिका आहे? अशी विचारणा प्रभारी महाअधिवक्ता रोहित देव यांच्याकडे केली. ‘पिण्यायोग्य पाणी वापरण्यात आल्यास कारवाई नक्की केली जाईल. पाणी पिण्यास अयोग्य असेल तर सरकारची काहीच हरकत नाही’ असा युक्तिवाद अ‍ॅड. देव यांनी केला.पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी महापालिका आणि जलसंपदा प्राधिकरणावर ढकलत आवश्यकता भासल्यास राज्य सरकार संबंधितांना आदेश देईल, असेही अ‍ॅड. देव यांनी खंडपीठाला सांगितले.‘किंग्स इलेव्हन पंजाब’चे उदाहरण पुढे करत उच्च न्यायालयाने अन्य टीमच्या भूमिकांवर नाराजी व्यक्त केली. ‘नागपूरमध्ये पाणी कमी आहे, म्हणून किंग्स इलेव्हन पंजाबने मोहोलीमध्ये सामने खेळवण्याची तयारी दर्शवली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अन्य टीमही अशीच भूमिका घेतली, अशी आशा आम्हाला होती. मात्र तसे झाले नाही. पैसे भरून या परिस्थितीवर तोडगा निघणार नाही,’ असे खडेबोल उच्च न्यायालयाने मुंबई व पुणे टीमना सुनावले. (प्रतिनिधी)३० एप्रिलनंतर राज्याबाहेरखेळपट्ट्यांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरले असले तरी ते पाणी खेळाडूंच्या आरोग्यासाठी चांगले नाही, असेही मत खंडपीठाने नोंदवत ३० एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश बीसीसीआयला दिले. बीसीसीआय व आयोजकांना सामन्यांची अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली.