शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दाऊदचे मोदी सरकारशी सेटलमेंट, फेसबुक पेजचे अनावरण, तरुणाईशी सोशल मीडियावरून संपर्क ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:23 IST

नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्या कार्यकाळात कसलाही बदल झाला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी केला.

मुंबई : नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्या कार्यकाळात कसलाही बदल झाला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारीकेला.मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजचे अनावरण झाले. याप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपा काय करणार आहे, त्यांची रणनीती काय असणार आहे याची माहिती माझ्यापर्यंत पोहचली आहे. ज्या चारपाच योजना आखल्या जात आहेत; त्यापैकी एक दाऊदला भारतात आणण्याचे नाटक आहे. दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन त्याला मरायचे आहे. सध्या त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु आहे. त्याला भारतात आणल्याचे श्रेय घेण्यासाठी हाप्रकार असल्याचा आरोप राज यांनी केला. मोठ्या विश्वासाने लोकांनी नरेंद्र मोदी यांना सत्ता दिली. सोशल मीडियातील भक्तांनी जसा मोदींवर विश्वास ठेवला तसा मी पण ठेवला. पण, साडेतीन वर्षात इव्हेंट आणि भाषणांच्या पलीकडे काहीही झालेले नाही. सोशल मीडीयामुळे आता काहीही लपून राहत नाही.मोदींच्या ट्विटर अकाऊंटमधील ४८ टक्के तर राहुल गांधींच्या अकाऊटंमधील ५४ टक्के फॉलोअर्स फेक आहेत. पण, माझ्या फेसबुक पेजवर फक्त खरी माहितीच टाकली जाईल, असा चिमटा त्यांनीकाढला.शेतकरी आत्महत्यांसारखे महत्वाचे विषय सोडून बुलेट ट्रेनची योजना आखली जात आहे. मुंबई मेट्रोच्या लगत गुजराती मतदारसंघ तयार करण्याचा घाट घातला जातोय. मेट्रोच्या नावाखाली बिल्डींग्स पाडायच्या, महागडी घरं बांधायची, ती मराठी माणसाला परवडणार नाहीत आणि हळूहळू आपले मतदार संघ निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप राज यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतर सततच्या पराभवांमुळे राज ठाकरे यांचा लोकांशी संपर्क तुटल्याचे बोलले जात होते. आता त्यावर उतारा म्हणून त्यांनी फेसबुक पेजचा आधार घेतल्याची चर्चा आहे.>राज ठाकरेंचा राणे यांना टोलामध्यंतरी भाजपाने फुटबॉल वाटले. फुटबॉल वाटले भाजपाने आणि सिंधुदुर्गात लाथ मारली काँग्रेसने! आता दोन्हीकडचे गोली म्हणतात माझ्याकडे नको, अशा शब्दांत राज यांनी नारायण राणे यांची फिरकी घेतली.