शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रलंबित गुन्हयांचा निपटारा तातडीने करा - पोलीस महासंचालकांचे आदेश

By admin | Updated: August 30, 2016 22:01 IST

गणोशोत्सव आणि बकरी ईदच्या बंदोबस्ताचा आढावा घेत प्रलंबित गुन्हयांचा निपटारा तातडीने करा, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाणे पोलीस

- जितेंद्र कालेकर

ठाणे, दि. 30 -  गणोशोत्सव आणि बकरी ईदच्या बंदोबस्ताचा आढावा घेत प्रलंबित गुन्हयांचा निपटारा तातडीने करा, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांसह सर्व वरीष्ठ पोलीस अधिका-यांच्या बैठकीत दिले. यावेळी संपूर्ण आयुक्तालयातील गुन्हयांचा आढावाही त्यांनी घेतला.    पोलीस महासंचालक पदाची सूत्रे घेतल्यानंतर माथूर यांनी प्रथमच सोमवारी ठाणो पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी आयुक्तांच्या दालनात त्यांनी सायंकाळी 6 ते 7.30 या दरम्यान बैठक घेतली. यावेळी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापसिंग पाटणकर, शरद शेलार, वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे, डॉ. रश्मी करंदीकर (मुख्यालय), संदीप भाजीभाकरे, पराग मणोरे (गुन्हे अन्वेषण विभाग), अभिजीत त्रिमुखे (ठाणो शहर), सुनिल लोखंडे (वागळे इस्टेट) यांच्यासह सर्व पोलीस उपायुक्त यावेळी उपस्थित होते.    आगामी गणोशोत्सवाच्या दृष्टीने यावेळी महासंचालकांनी आपल्या अधिका:यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. ब:याचदा गणपती बंदोबस्ताचे नियोजन गेल्या तीन वर्षातील घटनांचा आढावा घेऊन केले जाते. तसे न करता अगदी दहा वर्षापूर्वीच्या घटना, बंदोबस्तामधील त्रुटींचाही अभ्यास करुन तसे नियोजन करावे. राज्य पोलीस मुख्यालयाकडे जादा मनुष्यबळाची मागणी करतांना बंदोबस्ताचे योग्य नियोजन करावे, वास्तविक तशी गरज आहे का? याची पडताळणी करावी. मंडळाचे नेमके पदाधिकारी आणि त्यांचे सल्लागार (मुख्य सूत्रधार) यांचीही पोलीस ठाण्याच्या पातळीवर सर्व माहिती असणो आवश्यक आहे णरायाचे आगमन, विसर्जनाच्या वेळा आणि मिरवणूकीच्या मार्गाची इथ्यंभूत माहिती सर्व उपायुक्तांसह अधिका:यांकडे असावी. विसर्जनाच्या वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील जादा रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. तसेच विसर्जन तलाव आणि खाडीच्या ठिकाणी जीवरक्षक (पट्टीचे पोहणारे) ठेवल्याची खात्री करावी,असेही ते म्हणाले. याशिवाय, बकरी ईदचा बंदोबस्त करतांना चेक नाक्यांवर कसून तपासणी व्हावी. जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणा:यांवर करडी नजर ठेवा. पोलिसांचे काम अन्य कोणती यंत्रणा करीत असेल तर तसे व्हायला नको. पोलिसांना नागरिकांनी मदत जरुर करावी. पण पोलिसांऐवजी नागरिकच ती कामे करीत असेल तर तसेही व्हायला नको. उत्सवांच्या अथवा इतर काळातही एखादी दुर्घटना घडली तर बंदोबस्तामध्ये सुसूत्रता हवी. घटनेच्या गांभीर्यानुसार उपायुक्त, सहायक आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कधी भेटी द्याव्यात याचेही नियोजन करा. अन्यथा, सर्वच अधिकारी एकाच वेळी एकाच ठिकाणी जातील. गरजेनुसार ती विभागणी करा. गेल्या सहा महिन्यांमधील ठाणो आयुक्तालयातील ठाणो शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील 33 पोलीस ठाण्यांमधील गुन्हयांचा आढावा घेऊन माथूर यांनी गंभीर गुन्हयांचे आरोपपत्र लवकर दाखल करण्याच्याही सूचना यावेळी केल्या.