शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सभागृहातील गांभीर्य कमी होत आहे , माजी अध्यक्ष वळसे पाटील यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:50 IST

अलीकडच्या काळात सभागृहात सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेले नाही. गांभीर्यही कमी होत आहे. प्रश्नांना उत्तरे मिळतात, पण प्रश्न सोडवले जातात का, असा सवाल करत, याला दोन्ही बाजूंचे सदस्य आणि कामाकाजाची पद्धतीही काही अंशी जबाबदार आहे

अतुल कुलकर्णी 

मुंबई : अलीकडच्या काळात सभागृहात सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेले नाही. गांभीर्यही कमी होत आहे. प्रश्नांना उत्तरे मिळतात, पण प्रश्न सोडवले जातात का, असा सवाल करत, याला दोन्ही बाजूंचे सदस्य आणि कामाकाजाची पद्धतीही काही अंशी जबाबदार आहे, अशी खंत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.चालू पावसाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्यात वळसे पाटील यांनी कामकाजाबद्दल सतत नाराजी व्यक्त केली होती. काही मुद्दे मांडले, पण त्यावर निर्णय झाले नाहीत, यावरही त्यांनी भाष्य केले होते.दुसºया आठवड्याच्या पहिल्या दिवशीही शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा, भाजपा काँग्रेसचे सदस्यही आम्हाला सभागृहात बोलू द्या ,असे म्हणत नाराजी व्यक्त करताना दिसले. वळसे पाटील यांनी प्रश्नोत्तराचातास संपत आलेला असतानापाच मिनिटे वेळ वाढवा, पण मुद्दामांडू द्या, असे सांगितले, पण बरोबर१२च्या ठोक्याला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा ताससंपल्याचे घोषित केले. त्यानंतर,वळसे पाटील सभागृहाबाहेर निघून गेले.यावर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘या सभागृहाने अनेक संघर्ष पाहिले आहेत, मार्ग काढून पुढे जाणारे नेते, पिठासीन अधिकारी पाहिले आहेत. सामाजिक प्रश्नांवर एका उंचीवर जाणारी भाषणे पाहिली आहेत. विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला सारून समाज एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय झाल्याचे या सभागृहाने पाहिले आहे. प्रचंड उंचीचे नेते, त्यांचे विचार या सभागृहाने अनुभवले आहेत.