शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

सभागृहातील गांभीर्य कमी होत आहे , माजी अध्यक्ष वळसे पाटील यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:50 IST

अलीकडच्या काळात सभागृहात सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेले नाही. गांभीर्यही कमी होत आहे. प्रश्नांना उत्तरे मिळतात, पण प्रश्न सोडवले जातात का, असा सवाल करत, याला दोन्ही बाजूंचे सदस्य आणि कामाकाजाची पद्धतीही काही अंशी जबाबदार आहे

अतुल कुलकर्णी 

मुंबई : अलीकडच्या काळात सभागृहात सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेले नाही. गांभीर्यही कमी होत आहे. प्रश्नांना उत्तरे मिळतात, पण प्रश्न सोडवले जातात का, असा सवाल करत, याला दोन्ही बाजूंचे सदस्य आणि कामाकाजाची पद्धतीही काही अंशी जबाबदार आहे, अशी खंत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.चालू पावसाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्यात वळसे पाटील यांनी कामकाजाबद्दल सतत नाराजी व्यक्त केली होती. काही मुद्दे मांडले, पण त्यावर निर्णय झाले नाहीत, यावरही त्यांनी भाष्य केले होते.दुसºया आठवड्याच्या पहिल्या दिवशीही शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा, भाजपा काँग्रेसचे सदस्यही आम्हाला सभागृहात बोलू द्या ,असे म्हणत नाराजी व्यक्त करताना दिसले. वळसे पाटील यांनी प्रश्नोत्तराचातास संपत आलेला असतानापाच मिनिटे वेळ वाढवा, पण मुद्दामांडू द्या, असे सांगितले, पण बरोबर१२च्या ठोक्याला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा ताससंपल्याचे घोषित केले. त्यानंतर,वळसे पाटील सभागृहाबाहेर निघून गेले.यावर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘या सभागृहाने अनेक संघर्ष पाहिले आहेत, मार्ग काढून पुढे जाणारे नेते, पिठासीन अधिकारी पाहिले आहेत. सामाजिक प्रश्नांवर एका उंचीवर जाणारी भाषणे पाहिली आहेत. विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला सारून समाज एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय झाल्याचे या सभागृहाने पाहिले आहे. प्रचंड उंचीचे नेते, त्यांचे विचार या सभागृहाने अनुभवले आहेत.