शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम

By admin | Updated: June 3, 2015 02:13 IST

ग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यातील पर्यावरणीय अस्थिरतेमध्ये वाढ झाली असून सर्वाधिक अस्थिरता नंदुरबारमध्ये असून त्याखालोखाल धुळे, बुलढाणा,

संदीप प्रधान, मुंबईग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यातील पर्यावरणीय अस्थिरतेमध्ये वाढ झाली असून सर्वाधिक अस्थिरता नंदुरबारमध्ये असून त्याखालोखाल धुळे, बुलढाणा, जळगाव, हिंगोली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रालगतच्या समुद्राच्या पातळीत २०५० पर्यंत २ सेमी तर २१०० पर्यंत ४ सेमी इतकी वाढ संभवते.पर्यावरण विभागाने ग्लोबल वॉर्मिंगच्या गंभीर परिणामाबाबत मंगळवारी मंत्रालयात सादरीकरण केले. अमरावती विभागात बुलडाणा, औरंगाबाद विभागात हिंगोली, कोकण विभागात ठाणे, नागपूर विभागात गोंदिया, नाशिक विभागात नंदुरबार तर पुणे विभागात सोलापूर या जिल्ह्यांत पर्यावरणीय अस्थिरता सर्वाधिक आढळली आहे. महाराष्ट्र स्टेट अ‍ॅक्शन प्लान्स आॅन क्लायमेट चेंज या डॉ. राजेंद्र पचौरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवालानुसार महाराष्ट्रात ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. नजिकच्या काळात राज्याच्या पर्जन्यमानात बदल होतील, असे दिसते. २०३० पर्यंत वार्षिक सरासरी तापमानात १.०५ ते १.४ डिग्री सेल्सिअस वाढ होईल तर २०८० सालापर्यंत तापमानातील ही वाढ २.१८ ते ३.०९ डिग्री सेल्सिअस एवढी अपेक्षित आहे. परिणामी २०३० पर्यंत अमरावती विभागाचे तापमान १.४४ ते १.६४ डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद विभागाचे तापमान १.४४ ते १.५६ डिग्री सेल्सिअस, नाशिक विभागाचे तापमान १.४ ते १.६८ डिग्री सेल्सिअस, नागपूर विभागाचे तापमान १.१८ ते १.४ डिग्री सेल्सिअस, पुणे विभागाचे तापमान १.१५ ते १.२८ डिग्री सेल्सिअस, कोकण विभागाचे तापमान १.१ ते १.२८ डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे.