शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

कैद्यांमधील संवेदनशील माणूस शोधणारी चळवळ

By admin | Updated: December 7, 2014 00:25 IST

एखादाच बेसावध क्षण कुणाचे तरी आयुष्य व्यापून उरतो. संतापाच्या भरात स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसल्यावर हातून गुन्हा घडतो आणि शिक्षा होते. त्याची सल आयुष्यभर कैद्यांच्याही मनात असते.

- त्यांनाही हवा आहे निकोप समाज...गजानन चोपडे - नागपूरएखादाच बेसावध क्षण कुणाचे तरी आयुष्य व्यापून उरतो. संतापाच्या भरात स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसल्यावर हातून गुन्हा घडतो आणि शिक्षा होते. त्याची सल आयुष्यभर कैद्यांच्याही मनात असते. पण कैद्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मात्र उपेक्षेचा आणि हीनतेचाच. कैद्यांमध्येही माणूस असतो आणि त्यातही चांगुलपणा असतो, याचा समाजाला सोयीस्कर विसर पडतो. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नच होत नाही. पण आता एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे. त्यात एखाद्याने कैद्यांचे विचार जाणून घेतले तर.... राज्याच्या टोकावरील चंद्रपूरसारख्या शहरातून विदर्भ आणि आता मराठवाडामधील कैद्यांचे अनुभव आणि त्यांचे जीवनानुभव समाजाला एक नवी दृष्टी देऊ शकतात, हाच या प्रामाणिक प्रयत्नामागील हेतू. हा कैद्यांची केवळ भावनाच जाणून घेण्याचा नव्हे, तर माणसातल्या माणुसकीचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. खरं तर कैद्यांमधील संवेदनशील माणूस शोधणारी ही चळवळच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नावाचं औद्योगिक शहर. येथील श्रीलक्ष्मी नृसिंह नागरी पतसंस्थेचे श्रीनिवास सुंचूवार यांच्या पुढाकारातून कारागृहातील कैद्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि कैद्यांनी लेखणीतून व्यक्त केलेल्या भावना या उपक्रमाच्या यशाचं पहिलं पाऊल ठरलं.कारागृहातून सुटका झाल्यानंतर इतर बंदी बांधवांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?, हा या स्पर्धेचा विषय. ११ आॅगस्ट २००७ रोजी चंद्रपूर कारागृहात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ३० बंद्यांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ६४, यवतमाळ १२, भंडारा ४१, अमरावती ३३, वर्धा ६५, अकोला ५० तर बुलडाणा कारागृहातील २४ अशा एकूण ३१९ बंद्यांनी निबंधाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यातील काही बंदी तर उच्चशिक्षित आहेत. २००८ साली अमरावती कारागृहात घेण्यात झालेल्या स्पर्धेत प्रथम स्थान पटकाविणारा ज्ञानेश्वर लिहितो, ‘कारागृहाचे ब्रिदवाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन. गुन्हा ही आजारी मनाची खूण आहे. कारावासाचा उद्देश आजारी मनाला दुरुस्त करून त्याला समाजात प्रामाणिकपणे आणि सन्मानाने जगण्याचे बळ देणे, हेच कार्य कारागृहाचे आहे.’ द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार मिळविणाऱ्या प्रल्हादचे शिक्षण एम.ए. (अर्थ), एम.कॉम.पर्यंत झाले आहे.तो सांगतो, ‘कारागृहातून मुक्त झाल्यानंतर सहनशीलता आणि स्वत:वर विश्वास ठेवा. परमेश्वरावर श्रध्दा असू द्या. एखाद्या कार्याला अंतिम चरणावर बघायचे असेल तर संयम ठेवणे, हाच एकमेव मानवीय पर्याय आहे.’श्रीलक्ष्मी नृसिंह नागरी पतसंस्थेचा हा उपक्रम विदर्भापुरताच मर्यादित राहिला नसून मराठवाड्यातील (मध्य विभाग) औरंगाबाद, नाशिक, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, धुळे आणि जळगाव कारागृहातही मागील नोव्हेंबर महिन्यात ही निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात १५४ पुरुष आणि २ महिला बंद्यांनी सहभाग नोंदविला. आता उर्वरित महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये ही स्पर्धा राबविण्याचा सुंचूवार यांचा मानस आहे. एकंदरीत ही स्पर्धा नुसता उपक्रम राहिला नसून एक चळवळ झाली आहे.