शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

हुंड्याविरोधात संवेदनशील मने सरसावली!

By admin | Updated: May 14, 2017 04:55 IST

हुंड्यामुळे लग्न होत नसल्याच्या कारणावरून लातूर तालुक्यातील भिसे वाघोलीच्या शीतल वायाळ या मुलीने मरणाला कवटाळले.

राजकुमार जोंधळे,लातूर- हुंड्यामुळे लग्न होत नसल्याच्या कारणावरून लातूर तालुक्यातील भिसे वाघोलीच्या शीतल वायाळ या मुलीने मरणाला कवटाळले. या घटनेने सर्वच स्तरातील संवेदनशील मनांच्या माणसांचे काळीज चिरले. शीतल वायाळची पुनरावृत्ती होऊ द्यायचीच नाही, असा निर्धार करीत लातूरकरांनी आता हुंड्याविरोधात एल्गार पुकारला आहे. हुंड्यामुळे आपल्या जन्मदात्याला किती अपमान सहन करावा लागतोय. शिवाय हुंड्यामुळेच आपले लग्न होत नाही, या विवंचनेतून शीतलने टोकाचे पाऊल उचलले. मात्र, मरणापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेने लातूरकरांना हुंडाविरोधी चळवळीसाठी प्रवृत्त केले. जिल्ह्याच नव्हे तर, महाराष्ट्रात शीतल वायाळची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता हुंडाविरोधी वधू-वर सूचक मंडळाची स्थापनाही केली आहे. या चळवळीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मंडळाच्या, चळवळीतील प्राचार्य संग्राम मोरे, सचिन इंगळे, सुमेधा इंगळे, अजय सूर्यवंशी, सुप्रिया सूर्यवंशी आदींसह इतर कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हुंडाविरोधी चळवळीला अधिक गती देण्याचाही प्रयत्न प्रा. संग्राम मोरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘नो हुंडा डॉट कॉम’ या संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात आली आहे.तरुणांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न...हुंडाविरोधी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन, जागृती करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहोत, अशी माहिती प्रा. संग्राम मोरे यांनी दिली.