शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

हुंड्याविरोधात संवेदनशील मने सरसावली!

By admin | Updated: May 14, 2017 04:55 IST

हुंड्यामुळे लग्न होत नसल्याच्या कारणावरून लातूर तालुक्यातील भिसे वाघोलीच्या शीतल वायाळ या मुलीने मरणाला कवटाळले.

राजकुमार जोंधळे,लातूर- हुंड्यामुळे लग्न होत नसल्याच्या कारणावरून लातूर तालुक्यातील भिसे वाघोलीच्या शीतल वायाळ या मुलीने मरणाला कवटाळले. या घटनेने सर्वच स्तरातील संवेदनशील मनांच्या माणसांचे काळीज चिरले. शीतल वायाळची पुनरावृत्ती होऊ द्यायचीच नाही, असा निर्धार करीत लातूरकरांनी आता हुंड्याविरोधात एल्गार पुकारला आहे. हुंड्यामुळे आपल्या जन्मदात्याला किती अपमान सहन करावा लागतोय. शिवाय हुंड्यामुळेच आपले लग्न होत नाही, या विवंचनेतून शीतलने टोकाचे पाऊल उचलले. मात्र, मरणापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेने लातूरकरांना हुंडाविरोधी चळवळीसाठी प्रवृत्त केले. जिल्ह्याच नव्हे तर, महाराष्ट्रात शीतल वायाळची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता हुंडाविरोधी वधू-वर सूचक मंडळाची स्थापनाही केली आहे. या चळवळीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी मंडळाच्या, चळवळीतील प्राचार्य संग्राम मोरे, सचिन इंगळे, सुमेधा इंगळे, अजय सूर्यवंशी, सुप्रिया सूर्यवंशी आदींसह इतर कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हुंडाविरोधी चळवळीला अधिक गती देण्याचाही प्रयत्न प्रा. संग्राम मोरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘नो हुंडा डॉट कॉम’ या संकेतस्थळाचीही निर्मिती करण्यात आली आहे.तरुणांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न...हुंडाविरोधी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन, जागृती करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहोत, अशी माहिती प्रा. संग्राम मोरे यांनी दिली.