शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

आत्महत्येच्या इशाऱ्याने नवी मुंबईत खळबळ

By admin | Updated: August 5, 2016 02:30 IST

वाघिवली गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे पूर्ण गावानेच शासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

नवी मुंबई : वाघिवली गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे पूर्ण गावानेच शासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. या वृत्ताने नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. शासनाने नवी मुंबई वसविण्यासाठी ठाणे, पणवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. ४५ वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. सर्वात गंभीर स्थिती पनवेल तालुक्यामधील वाघिवलीमधील प्रकल्पग्रस्तांची आहे. येथील ६६ कुळांची नावेच सातबाऱ्यावरून वगळण्यात आली आहेत. तब्बल १५२ एकर जमीन संपादित करून त्याचा काहीही मोबदला दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के योजनेचा लाभ सावकाराला देण्यात आला असून त्याने मिळालेले भूखंड परस्पर विकले आहेत. पाठपुरावा करूनही सिडको व शासनाकडून न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी असा अर्ज मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. प्रकल्पग्रस्त संघटनांनी वाघिवली ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. वाघिवली ग्रामस्थांच्या इशाऱ्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. एनआरआय पोलिसांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले होते. ग्रामस्थांशी संवाद साधून आत्महत्या करण्यापासून परावृत्त व्हावे असे सांगितले. परंतु ग्रामस्थांनी आत्महत्येच्या मुद्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. वडिलोपार्जित जमीनही गेली व मोबदलाही मिळालेला नाही. यामुळे शासनाने आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही आत्महत्या करणार असे स्पष्ट केले आहे. यामुळे भविष्यात हा संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन व सिडको प्रशासन याविषयी काय भूमिका घेणार याकडे आता ग्रामस्थांसह सर्व प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)