शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येच्या इशाऱ्याने नवी मुंबईत खळबळ

By admin | Updated: August 5, 2016 02:30 IST

वाघिवली गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे पूर्ण गावानेच शासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

नवी मुंबई : वाघिवली गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे पूर्ण गावानेच शासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. या वृत्ताने नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. शासनाने नवी मुंबई वसविण्यासाठी ठाणे, पणवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. ४५ वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. सर्वात गंभीर स्थिती पनवेल तालुक्यामधील वाघिवलीमधील प्रकल्पग्रस्तांची आहे. येथील ६६ कुळांची नावेच सातबाऱ्यावरून वगळण्यात आली आहेत. तब्बल १५२ एकर जमीन संपादित करून त्याचा काहीही मोबदला दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के योजनेचा लाभ सावकाराला देण्यात आला असून त्याने मिळालेले भूखंड परस्पर विकले आहेत. पाठपुरावा करूनही सिडको व शासनाकडून न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी असा अर्ज मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. प्रकल्पग्रस्त संघटनांनी वाघिवली ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. वाघिवली ग्रामस्थांच्या इशाऱ्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. एनआरआय पोलिसांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले होते. ग्रामस्थांशी संवाद साधून आत्महत्या करण्यापासून परावृत्त व्हावे असे सांगितले. परंतु ग्रामस्थांनी आत्महत्येच्या मुद्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. वडिलोपार्जित जमीनही गेली व मोबदलाही मिळालेला नाही. यामुळे शासनाने आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही आत्महत्या करणार असे स्पष्ट केले आहे. यामुळे भविष्यात हा संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन व सिडको प्रशासन याविषयी काय भूमिका घेणार याकडे आता ग्रामस्थांसह सर्व प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)