शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कराडकर यांचे निधन

By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST

अंत्यदर्शनासाठी गर्दी : आज सांगलीत अंत्यसंस्कार

सांगली : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पुरोगामी कृतिशील कार्यकर्ते आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील यांचे निकटचे सहकारी नामदेवराव बाळकृष्ण कराडकर (वय ९१) यांचे आज, मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढ्यातील आणखी एक दुवा निखळल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच होते. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, चतुरंग अ‍ॅडव्हर्टायझर्सचे संचालक, कवी महेश आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते राजेश ही दोन मुले, दोन विवाहित कन्या, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. दादा नावाने परिचित असलेल्या नामदेवराव कराडकर यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. क्रांतिलढ्याची पत्रके वाटणे, क्रांतिकारकांचे संदेश पोहचविणे, स्फोटके आणि शस्त्रांचा साठा सुरक्षित ठेवणे यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ते ब्रिटीशांविरोधात लढले. क्रांतिलढ्यात त्यांनी वसंतदादांसोबतच कारावास भोगला होता. २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा तुरुंग फोडण्याची कामगिरी करणाऱ्या वसंतदादांसोबतच्या क्रांतिकारकांच्या गटात ते सहभागी होते. स्वातंत्र्यानंतर कराडकर यांनी कामगार चळवळीत स्वत:ला झोकून दिले. साखर कामगार आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी लढा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कामगार चळवळ, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, आयुर्वेद, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात त्यांनी लोकहिताचा हेका घेऊन कोणताही अभिनिवेष न बाळगता कार्यरत राहणे पसंत केले. सांगली जिल्'ातील पुरोगामी चळवळीला बळ देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अखेरपर्यंत पुरोगामी कृतिशीलता जपली. अत्यंत साधी राहणी आणि कणखर विचार हे त्यांचे वैशिष्ट्य होय. सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, वाळव्याचा हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना, यशवंत सहकारी सिमेंट संस्था, शाहू इन्स्टिट्यूट या संस्थांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला होता. बलवडी येथील बळीराजा धरण उभारणीतही ते अग्रभागी होते. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत उद्या (बुधवारी) सकाळी ९ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.