शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचं निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:12 IST

थोर स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुुंबईतील निवासस्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १९ : स्वातंत्र्याचा महामेरू व सातारा जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे (भि. दा. भिलारे गुरुजी) यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुुंबईतील निवासस्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. भि.दा. गुरुजी यांचे स्वातंत्र्यलढ्यात खूप मोठे योगदान आहे. ऐन उमेदीचा काळात भिलारे गुरुजींनी स्वत:ला स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतले. त्या काळी त्यांच्यावर लहानपणापासून महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव होता.भिलारे गुरुजींनी स्वत: ला स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले. महाराष्ट्रातील घराघरात क्रांतिकारी विचार पोचविण्याचे काम आपल्या सवंगड्यांसोबत घेऊन गावोगावी भटकंती करत विचार पोचविण्याचे काम केले. गुरुजींच्या या कार्याचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी यांनी महाबळेश्वर येथून येऊन भि. दा. भिलारे गुरुजींचा गौरव केला होता.जावळी महाबळेश्वर तालुका पूर्वी एकत्र होता आणि या दुर्गम भागाची व्यथा फक्त गुरुजींना माहित होती. त्यावेळी गाड्यांची सुविधा उपलब्ध नव्हती, अशा वेळेस डोंगर कपाऱ्या उतरत लोकांपर्यंत पोचत लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्रधान्य देत असत. त्यांनी अनेक विधानसभेच्या निवडणुका जिंकत विधानसभेत प्रवेश केला आणि पूर्वीच्या जावळी मतदार संघाचा आमदार होण्याचे भाग्य मिळविले. या आमदारकीच्या काळात अनेक सवंगड्यांना सोबत घेऊन त्यानी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि जावळी तालुक्यात खऱ्या अथार्ने सहकार चळवळ चालू केली. त्या माध्यमातून गुरुजी सर्व राजकीय लोकांमध्ये लोकप्रिय झाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापना तसेच किसन वीर साखर कारखाना जावळी सहकारी बँक अशा अनेक सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळात सुद्धा अनेक आमदार खासदार हे भिलारे गुरुजींच्या मार्गदर्शन घेऊनच आपले कामकाज करीत असत.

भिलारची माती पोरकी...
भिलारची माती आज या थोर पितामहाच्या जाण्यामुळे पोरकी झाली आहे. भिलारे गुरुजींचे सर्व राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध होते. पांचगणी, महाबळेश्वरात येणारी प्रत्येक राजकीय व्यक्ती भिलारमध्ये येऊन भिलारे गुरुजींना न भेटता कधीच जात नसत.
 
महात्मा गांधींना नथुरामपासून वाचविलेमहात्मा गांधी यांच्यावर पांचगणी येथे जेव्हा नथुराम गोडसे याने सर्वप्रथम हल्ला केला, तेव्हा भिलारे गुरुजींनीच गांधीजींना वाचविले होते. नथुरामचा गांधींजीवर हल्ला करण्याचा हा पहिला प्रयत्न होता, तो भिलारे गुरुजींमुळेच फसला होता. भिलारे गुरुजी गांधींजीच्या मध्ये आल्यामुळे हा हल्ला टळला.