शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचं निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:12 IST

थोर स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुुंबईतील निवासस्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १९ : स्वातंत्र्याचा महामेरू व सातारा जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे (भि. दा. भिलारे गुरुजी) यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुुंबईतील निवासस्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. भि.दा. गुरुजी यांचे स्वातंत्र्यलढ्यात खूप मोठे योगदान आहे. ऐन उमेदीचा काळात भिलारे गुरुजींनी स्वत:ला स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतले. त्या काळी त्यांच्यावर लहानपणापासून महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव होता.भिलारे गुरुजींनी स्वत: ला स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले. महाराष्ट्रातील घराघरात क्रांतिकारी विचार पोचविण्याचे काम आपल्या सवंगड्यांसोबत घेऊन गावोगावी भटकंती करत विचार पोचविण्याचे काम केले. गुरुजींच्या या कार्याचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी यांनी महाबळेश्वर येथून येऊन भि. दा. भिलारे गुरुजींचा गौरव केला होता.जावळी महाबळेश्वर तालुका पूर्वी एकत्र होता आणि या दुर्गम भागाची व्यथा फक्त गुरुजींना माहित होती. त्यावेळी गाड्यांची सुविधा उपलब्ध नव्हती, अशा वेळेस डोंगर कपाऱ्या उतरत लोकांपर्यंत पोचत लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्रधान्य देत असत. त्यांनी अनेक विधानसभेच्या निवडणुका जिंकत विधानसभेत प्रवेश केला आणि पूर्वीच्या जावळी मतदार संघाचा आमदार होण्याचे भाग्य मिळविले. या आमदारकीच्या काळात अनेक सवंगड्यांना सोबत घेऊन त्यानी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि जावळी तालुक्यात खऱ्या अथार्ने सहकार चळवळ चालू केली. त्या माध्यमातून गुरुजी सर्व राजकीय लोकांमध्ये लोकप्रिय झाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापना तसेच किसन वीर साखर कारखाना जावळी सहकारी बँक अशा अनेक सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळात सुद्धा अनेक आमदार खासदार हे भिलारे गुरुजींच्या मार्गदर्शन घेऊनच आपले कामकाज करीत असत.

भिलारची माती पोरकी...
भिलारची माती आज या थोर पितामहाच्या जाण्यामुळे पोरकी झाली आहे. भिलारे गुरुजींचे सर्व राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध होते. पांचगणी, महाबळेश्वरात येणारी प्रत्येक राजकीय व्यक्ती भिलारमध्ये येऊन भिलारे गुरुजींना न भेटता कधीच जात नसत.
 
महात्मा गांधींना नथुरामपासून वाचविलेमहात्मा गांधी यांच्यावर पांचगणी येथे जेव्हा नथुराम गोडसे याने सर्वप्रथम हल्ला केला, तेव्हा भिलारे गुरुजींनीच गांधीजींना वाचविले होते. नथुरामचा गांधींजीवर हल्ला करण्याचा हा पहिला प्रयत्न होता, तो भिलारे गुरुजींमुळेच फसला होता. भिलारे गुरुजी गांधींजीच्या मध्ये आल्यामुळे हा हल्ला टळला.