शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचं निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:12 IST

थोर स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुुंबईतील निवासस्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १९ : स्वातंत्र्याचा महामेरू व सातारा जिल्ह्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे (भि. दा. भिलारे गुरुजी) यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मुुंबईतील निवासस्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. भि.दा. गुरुजी यांचे स्वातंत्र्यलढ्यात खूप मोठे योगदान आहे. ऐन उमेदीचा काळात भिलारे गुरुजींनी स्वत:ला स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतले. त्या काळी त्यांच्यावर लहानपणापासून महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव होता.भिलारे गुरुजींनी स्वत: ला स्वातंत्र्यासाठी वाहून घेतले. महाराष्ट्रातील घराघरात क्रांतिकारी विचार पोचविण्याचे काम आपल्या सवंगड्यांसोबत घेऊन गावोगावी भटकंती करत विचार पोचविण्याचे काम केले. गुरुजींच्या या कार्याचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी यांनी महाबळेश्वर येथून येऊन भि. दा. भिलारे गुरुजींचा गौरव केला होता.जावळी महाबळेश्वर तालुका पूर्वी एकत्र होता आणि या दुर्गम भागाची व्यथा फक्त गुरुजींना माहित होती. त्यावेळी गाड्यांची सुविधा उपलब्ध नव्हती, अशा वेळेस डोंगर कपाऱ्या उतरत लोकांपर्यंत पोचत लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्रधान्य देत असत. त्यांनी अनेक विधानसभेच्या निवडणुका जिंकत विधानसभेत प्रवेश केला आणि पूर्वीच्या जावळी मतदार संघाचा आमदार होण्याचे भाग्य मिळविले. या आमदारकीच्या काळात अनेक सवंगड्यांना सोबत घेऊन त्यानी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि जावळी तालुक्यात खऱ्या अथार्ने सहकार चळवळ चालू केली. त्या माध्यमातून गुरुजी सर्व राजकीय लोकांमध्ये लोकप्रिय झाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापना तसेच किसन वीर साखर कारखाना जावळी सहकारी बँक अशा अनेक सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळात सुद्धा अनेक आमदार खासदार हे भिलारे गुरुजींच्या मार्गदर्शन घेऊनच आपले कामकाज करीत असत.

भिलारची माती पोरकी...
भिलारची माती आज या थोर पितामहाच्या जाण्यामुळे पोरकी झाली आहे. भिलारे गुरुजींचे सर्व राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध होते. पांचगणी, महाबळेश्वरात येणारी प्रत्येक राजकीय व्यक्ती भिलारमध्ये येऊन भिलारे गुरुजींना न भेटता कधीच जात नसत.
 
महात्मा गांधींना नथुरामपासून वाचविलेमहात्मा गांधी यांच्यावर पांचगणी येथे जेव्हा नथुराम गोडसे याने सर्वप्रथम हल्ला केला, तेव्हा भिलारे गुरुजींनीच गांधीजींना वाचविले होते. नथुरामचा गांधींजीवर हल्ला करण्याचा हा पहिला प्रयत्न होता, तो भिलारे गुरुजींमुळेच फसला होता. भिलारे गुरुजी गांधींजीच्या मध्ये आल्यामुळे हा हल्ला टळला.