शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांना परत पाठवा

By admin | Updated: July 18, 2016 03:24 IST

महापालिकेच्या एकंदरीतच ढिम्म कारभाराचे खापर शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर फोडले

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एकंदरीतच ढिम्म कारभाराचे खापर शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर फोडले आहे. या अधिकाऱ्यांना तातडीने सरकारकडे परत पाठवावे, अन्यथा महासभेत त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत, त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांनाही निवेदन दिले आहे. सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी कुठलेही काम करीत नाहीत. महापालिके चे नियम त्यांना माहीत नाहीत. यात महापालिकेची प्रत्येक कामे सरकारकडे पाठवण्याचा निर्णय होत असल्याने सामान्य प्रशासनाचे उपायुक्त दीपक पाटील, मिलिंद धाट, परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे, असा आरोप जाधव यांनी निवेदनात केला आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती रखडल्याबाबत त्यांनी या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. प्रशासनाचे काम पूर्णत: ढिम्म झाल्याने नागरिकांमध्ये नगरसेवकांची प्रतिमा मलिन करण्याचे काम हे अधिकारी करीत असल्याने या अधिकाऱ्यांना तातडीने सरकारकडे परत पाठवावे, अन्यथा त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला जाईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी) >महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत मौन का?सरकारचे अधिकारी काम करीत नसल्याने नगरसेवकांची प्रतिमा मलिन होत असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. यात त्यांनी सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांवर जाधव यांनी तोफ डागली असली तरी ध्वनिचित्रफीत माध्यमातून महापालिकेचे अधिकारी दीपक भोसले आणि पी.के. उगले यांच्या उघड झालेल्या लाचखोरीबाबत जाधव यांचे मौन का, असा सवाल पालिका वर्तुळात चर्चिला जात आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्त संजय घरत व प्रभारी सचिव सुभाष भुजबळ यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली आहे. या अधिकाऱ्यांच्या एकंदरीतच प्रतापामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली, असे जाधव यांना वाटत नाही का, असा मुद्दाही चर्चिला जात आहे. ‘ते’ अधिकारी नेहमीच रोषाचे बळीआतापर्यंतचा इतिहास पाहता सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी नेहमीच नगरसेवकांच्या रोषाचे बळी पडताना दिसतात. मात्र, महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांची सहानुभूतीची भूमिका दिसून येते. शिवसेना गटनेते जाधव यांच्या निवेदनावरून हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.