शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांना परत पाठवा

By admin | Updated: July 18, 2016 03:24 IST

महापालिकेच्या एकंदरीतच ढिम्म कारभाराचे खापर शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर फोडले

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एकंदरीतच ढिम्म कारभाराचे खापर शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर फोडले आहे. या अधिकाऱ्यांना तातडीने सरकारकडे परत पाठवावे, अन्यथा महासभेत त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत, त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांनाही निवेदन दिले आहे. सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी कुठलेही काम करीत नाहीत. महापालिके चे नियम त्यांना माहीत नाहीत. यात महापालिकेची प्रत्येक कामे सरकारकडे पाठवण्याचा निर्णय होत असल्याने सामान्य प्रशासनाचे उपायुक्त दीपक पाटील, मिलिंद धाट, परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे, असा आरोप जाधव यांनी निवेदनात केला आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती रखडल्याबाबत त्यांनी या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. प्रशासनाचे काम पूर्णत: ढिम्म झाल्याने नागरिकांमध्ये नगरसेवकांची प्रतिमा मलिन करण्याचे काम हे अधिकारी करीत असल्याने या अधिकाऱ्यांना तातडीने सरकारकडे परत पाठवावे, अन्यथा त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला जाईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी) >महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत मौन का?सरकारचे अधिकारी काम करीत नसल्याने नगरसेवकांची प्रतिमा मलिन होत असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. यात त्यांनी सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांवर जाधव यांनी तोफ डागली असली तरी ध्वनिचित्रफीत माध्यमातून महापालिकेचे अधिकारी दीपक भोसले आणि पी.के. उगले यांच्या उघड झालेल्या लाचखोरीबाबत जाधव यांचे मौन का, असा सवाल पालिका वर्तुळात चर्चिला जात आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता भंगाचा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्त संजय घरत व प्रभारी सचिव सुभाष भुजबळ यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखली आहे. या अधिकाऱ्यांच्या एकंदरीतच प्रतापामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली, असे जाधव यांना वाटत नाही का, असा मुद्दाही चर्चिला जात आहे. ‘ते’ अधिकारी नेहमीच रोषाचे बळीआतापर्यंतचा इतिहास पाहता सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी नेहमीच नगरसेवकांच्या रोषाचे बळी पडताना दिसतात. मात्र, महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांची सहानुभूतीची भूमिका दिसून येते. शिवसेना गटनेते जाधव यांच्या निवेदनावरून हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.