शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत नमुने पाठवून कारण शोधणार

By admin | Updated: February 16, 2016 03:49 IST

गिरगावात रविवारी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात लागलेल्या आगीचे कारण मुंबई पोलीस न्यायवैद्यक प्रयोगशाळेला (एफएसएल) नमुने पाठवून स्वतंत्रपणे शोधणार आहेत.

डिप्पी वांकाणी,  मुंबईगिरगावात रविवारी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात लागलेल्या आगीचे कारण मुंबई पोलीस न्यायवैद्यक प्रयोगशाळेला (एफएसएल) नमुने पाठवून स्वतंत्रपणे शोधणार आहेत. मुंबई पोलीस या आगीची महानगरपालिकेसोबतही चौकशी करीत आहेत. अजूनपर्यंत तरी मुंबई पोलिसांनी आगीबद्दल तक्रार नोंदविलेली नाही. आम्ही कार्यक्रमाचे संघटक आणि प्रत्यक्ष या घटनेच्या साक्षीदारांचे म्हणणे नोंदवून घेणार आहोत आणि आग मुद्दाम कोणी लावली का याचीही चौकशी करणार आहोत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या उप कंत्राटदारांचीही त्यांनी कार्यक्रमात दुय्यम दर्जाचे साहित्य/उपकरणे वापरली का अशीही चौकशी केली जाणार आहे.सध्या आम्ही या घटनेसंदर्भात डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी तयार केली आहे. मुंबई महानगर पालिका आणि अग्निशमन दल हे आगीचे कारण शोधण्यात तज्ज्ञ असून ते आपला अहवाल सादर करतील. तरीही आम्ही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी नमुने पाठविणार आहोत. कार्यक्रमाचे आयोजक विझक्राफ्ट आणि त्यांचे उपकंत्राटदार यांचे म्हणणे नोंदवून घेणार आहोत. आम्ही ही घटना प्रत्यक्ष बघणाऱ्यांचेही म्हणणे नोंदवून घेणार आहोत, तसेच आमच्या निष्कर्षांनुसार काय कायदेशीर कारवाई करायची याचा निर्णय घेणार आहोत, असे मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ते श्रोत्यांतून ज्यांनी आगीचे व्हिडीओ चित्रीकरण केले ते आग प्राथमिक पातळीवर कशी उघडकीस आली हे तपासण्यासाठी गोळा करीत आहेत. हा आगीचा प्रकार कोणाकडून घातपातासाठी करण्यात आला आहे का हेदेखील आम्ही तपासणार आहोत, असेही हा अधिकारी म्हणाला. उप कंत्राटदाराने वापरलेली उपकरणे दुय्यम दर्जाची होती का व त्यामुळे आग लागली हेही आम्ही तपासून बघणार आहोत, असेही अधिकारी म्हणालाबॅरिकेड्सचा अडथळागिरगाव चौपाटीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारलेले बॅरिकेड्स, मेटल डिटेक्टर, पत्र्यांच्या पार्टिशन्समुळे महाराष्ट्र रजनी कार्यक्रमाच्या स्टेजला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलास शर्थीचे प्रयत्न करावे लागले़ अखेर पोलिसांच्या मदतीने बॅरिकेड्स हटविल्यानंतर मदतकार्याला वेग मिळाला, असा अहवाल अग्निशमन दलाने दिला आहे़ या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ वाहतूक कोंडी फोडत घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच अवधी वाया गेल्याचे, अग्निशमन दलाने निदर्शनास आणले आहे़घाईत केली तयारी आयोजक नितीन देसाई यांनी संघटकांकडे व्यासपीठ त्याची रचना करून रविवारी दुपारी साडेचार वाजता सोपविल्यामुळे कार्यक्रमाची अंतिम तयारी घाईघाईत करण्यात आली. नंतरच इतर व्यवस्था कराव्या लागल्या.तंत्र महागात पडलेआग आणि धुराच्या परिणामांसाठी (इफेक्ट्स) वापरण्यात आलेले पायरो तंत्र या शोसाठी खूपच महागात पडले. वाऱ्याची दिशा समुद्राच्या दिशेने होती. ती तशी नसती तर त्यामुळे फार मोठा अपघात घडला असता, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गिरगाव चौपाटीवर रविवारी रात्री ‘महाराष्ट्र रजनी’च्या व्यासपीठाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर, वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’च्या सप्ताहातील अग्निप्रतिबंधक सुरक्षा आणखी चोख करण्यात आली आहे. विशेषत: एमएमआरडीएच्या मैदानावर आग विझवण्यासाठी ५०० साधने आणि ५० फायर मार्शल तैनात करण्यात आले आहेत. शिवाय आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.