शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

शैक्षणिक धोरणासाठी सूचना पाठवा

By admin | Updated: November 18, 2015 03:17 IST

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी ६ तास की ८ तास यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा अनावश्यक असून, काही आमदार मतांच्या राजकारणासाठी ही चर्चा

मुंबई : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी ६ तास की ८ तास यावरून सध्या चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा अनावश्यक असून, काही आमदार मतांच्या राजकारणासाठी ही चर्चा घडवून आणत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष गुणवत्तेचा विचार करण्यासाठी शिक्षण विभागाने या धोरणाचा प्रस्तावित मसुदा https://education.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर अपलोड केला असून, यामध्ये सर्व संबंधितांनी आपल्या सूचना, अभिप्राय सादर करावेत आणि त्यानंतरच हे धोरण अंतिम होईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.केंद्र सरकारतर्फे सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार राज्य सरकारने प्रथमच गावपातळीवर ३२ हजार गावांत जाऊन या शैक्षणिक धोरणावर चर्चा घडवून आणली. १४ शैक्षणिक प्रश्नांवर आधारित विविध प्रश्नांवर गाव, तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर या धोरणाबाबत सर्वंकष चर्चा केली. त्या स्तरावरील सर्व संबंधितांची मते जाणून घेतली, त्यातून काही सूचनाही प्राप्त झाल्या. या चर्चेच्या माध्यमातून पुढे आलेल्या शैक्षणिक धोरणातील बाबी जनतेच्या विचारासाठी आमच्या विभागाच्या वतीने वेबसाईटवर टाकण्यात आल्या आहेत, त्यामुळे धोरणाचा अंतिम मसुदा ठरविताना त्यांच्या मतांचाही नक्कीच विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणाबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले.धोरणाच्या अनुषंगाने मुख्याध्यापक संघटनांनी आपली मते मांडली. त्यांच्या सूचनांचा विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांचा भवितव्याच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रातील संबंधितांनी वेबसाईटच्या माध्यमातून आपली मते व सूचना मांडाव्यात, जेणेकरून प्रस्तावित शैक्षणिक धोरण प्रभावी होऊ शकेल, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले.