शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्री तावडेंना घरी पाठवा

By admin | Updated: March 11, 2016 04:24 IST

मंत्र्यांनी कोणत्याही कंपनीमध्ये संचालक राहता कामा नये, या केंद्र सरकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे अद्याप मंत्रिमंडळात कसे? असा सवाल करत, तावडेंना तत्काळ घरी पाठवा

मुंबई : मंत्र्यांनी कोणत्याही कंपनीमध्ये संचालक राहता कामा नये, या केंद्र सरकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे अद्याप मंत्रिमंडळात कसे? असा सवाल करत, तावडेंना तत्काळ घरी पाठवा, असा हल्लाबोल विरोधी पक्षांनी आज विधानसभेत केला. यावरून झालेल्या गदारोळात कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तावडे यांनी मंत्र्यांसाठीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करीत, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली. विखे, चव्हाण, तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह धरला. तावडे यांच्यावर आरोप करण्यासाठी नियम ३५ नुसार आधी नोटीस द्यायला हवी होती, असे सांगत, अध्यक्ष बागडे यांनी विखे पाटील यांनी दिलेली स्थगन प्रस्तावाची सूचना फेटाळली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य वेलमध्ये येऊनतावडेंच्या राजीनाम्याची मागणी करू लागले. यावेळी तावडे सभागृहात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपण या बाबत आजच निवेदन करू असे सांगितले. मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. मी आजच उत्तर देईन पण आघाडी सरकारच्या काळात किती मंत्री कुठे संचालक होते हेही पहावे लागेल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाने विरोधक अधिकच संतप्त झाले. हे सुडाचे राजकारण असून हा धमकावण्याचा प्रकार आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. चवथ्यांदा ते सुरू झाल्यानंतर विरोधकांनी कामकाजात सहभाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)————————————————गोंधळलेले विरोधकमुद्दा सोडतात तेव्हा...काँग्रेस-राष्ट्रवादीतील समन्वयाचा अभाव, विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची कमी पडलेली आक्रमकता याचा अनुभव आज सभागृहात आला. काँग्रेसचे सदस्य दुष्काळाकडे लक्ष वेधणारे फलक घेऊन सभागृहात आले पण विखे यांनी मागणी लावून धरली ती तावडेंच्या राजीनाम्याची! त्यामुळे विरोधकांना नेमके काय हवे आहे, हे समजेना. ‘विरोधक गोंधळलेले आहेत. ते कधी दुष्काळ धरतात, तर कधी मंत्र्यांना पकडतात. जरा पाचदहा मिनिटे विचार करून मग पुन्हा सभागृहा या’ असा टोला महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांना लगावला.