शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस सेनेचे मंत्री निमूटपणे उपस्थित, दसरा मेळाव्याकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:02 IST

‘मातोश्री’वर सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा बोलली गेली, आम्ही निर्णय घेण्याच्या टप्प्यात आहोत, असे सांगितले गेले असताना राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीला शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री निमूटपणे हजर होते.

यदु जोशी मुंबई : ‘मातोश्री’वर सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा बोलली गेली, आम्ही निर्णय घेण्याच्या टप्प्यात आहोत, असे सांगितले गेले असताना राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीला शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री निमूटपणे हजर होते.‘मातोश्री’वरील बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी,‘सरकारमध्ये त्यांची कामेच होत नाहीत. भाजपाचे मंत्री त्यांची अडवणूक करतात’ असे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मंत्री आज मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहतील की नाही याची चर्चा होती. १ तास २० मिनिटे मंत्रिमंडळ बैठक झाली. शिवसेनेच्या आमदारांची विकास कामे होत नसल्याची तक्रार सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बैठकीत केली नाही. कुठल्याच निर्णयाला विरोध केला नाही.‘कामेच होत नसतील तर सरकारमधून बाहेर पडा, विरोधी पक्षात राहून काम करू’ असा आग्रह बहुतेक आमदारांनी मातोश्रीवरील सोमवारच्या बैठकीत धरला होता. सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले नाहीत. शिवसेनेचे मंत्री त्यांच्या परवानगीनेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिले. याचा अर्थ केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करतानाच सरकारमध्ये कायम राहण्याकडेच सेना नेतृत्वाचा कल आहे, असे म्हटले जाते. शिवसेना मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला असता तर फडणवीस यांना तो इशारा ठरला असता पण मंत्री हजर राहिल्याने भाजपाशी समन्वयाची भूमिका राहील, असे संकेत शिवसेनेने दिले.फुटीची भीती!फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तर सेनेत फूट पडण्याची शक्यता आहे. एक तृतीयांश आमदार भाजपाच्या गळाला लागले तर त्यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळेल आणि सरकारच्या स्थैर्यावरही विपरित परिणाम होणार नाही. मातोश्रीवरील कालच्या बैठकीत सेनेच्या नेत्यांच्या (मनोहर जोशी, खा.संजय राऊत) भाषणांमध्येही पक्ष सोडून जाणारे संपतात हा अनुभव आहे, असा इशारा देत दुसरीकडे त्यांना चुचकारले होते.>शिवसेनेतील अस्वस्थेतच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३० सप्टेंबरला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात काय बोलतात याची उत्सुकता असेल. भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा करणार का, ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.