शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

शिवसेनेमुळे युतीच्या जागा गेल्या १० वर्षांत घसरल्या - प्रकाश जावडेकर

By admin | Updated: October 6, 2014 18:20 IST

गेल्या १५ वर्षांमध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी कमी होत गेल्या, याला शिवसेना कारणीभूत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - गेल्या १५ वर्षांमध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी कमी होत गेल्या, याला शिवसेना कारणीभूत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी एका कार्यक्रमात केला आहे. आमच्या दोघांच्या मिळून १४० जागा होत्या, त्या १३० वर आल्या, त्यानंतर ८५ - ९० जागांपर्यंत युतीच्या जागा आल्या. कारण शिवसेनेने जागाबदलांबाबत लवचिकताच दाखवली नाही आणि भाजपा शिवसेना युतीच्या जागा कमी कमी होत गेल्याचे जावडेकर म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे असते तर आज युती तुटली नसती असे सांगत प्रकाश जावडेकरांनी युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून दिले. सरसंघचालकांचं भाषण दूरदर्शनवर लाइव्ह दाखवल्याबद्दल व त्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले की आरएसएस ही धार्मिक नाही तर सामाजिक संघटना आहे. तसेच दूरदर्शननं काय दाखवायचं व काय नाही याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी प्रसारमाध्यमं जी काँग्रेसच्या काळात दबलेली होती, ती आम्ही मुक्त केली असल्याचा दावा जावडेकरांनी केला आहे.
आमचा लढा शिवसेनेशी नसून आमचा लढा काँग्रेस व राष्ट्रवादीसी असल्याचं सांगत जनता कुशासनाला त्रस्त झाली असल्यानं आम्हाला बहुमतानं निवडून देईल असा विश्वासही जावडेकरांनी व्यक्त केला.
यावेळी शरद पवार यांच्यावर टीका करताना जावडेकर म्हणाले की शरद पवार पावणेपाच वर्षे सेक्युलर असतात, आणि निवडणुका आल्या की तीन महिने अत्यंत जातीयवादी असतात. मोदींवर शरद पवार करत असलेली टीका म्हणजे ते या निवडणुकांना अत्यंत घाबरत असल्याचे द्योतक असल्याचे जावडेकर म्हणाले.