शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

शिवसेनेमुळे युतीच्या जागा गेल्या १० वर्षांत घसरल्या - प्रकाश जावडेकर

By admin | Updated: October 6, 2014 18:20 IST

गेल्या १५ वर्षांमध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी कमी होत गेल्या, याला शिवसेना कारणीभूत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - गेल्या १५ वर्षांमध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी कमी होत गेल्या, याला शिवसेना कारणीभूत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी एका कार्यक्रमात केला आहे. आमच्या दोघांच्या मिळून १४० जागा होत्या, त्या १३० वर आल्या, त्यानंतर ८५ - ९० जागांपर्यंत युतीच्या जागा आल्या. कारण शिवसेनेने जागाबदलांबाबत लवचिकताच दाखवली नाही आणि भाजपा शिवसेना युतीच्या जागा कमी कमी होत गेल्याचे जावडेकर म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे असते तर आज युती तुटली नसती असे सांगत प्रकाश जावडेकरांनी युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून दिले. सरसंघचालकांचं भाषण दूरदर्शनवर लाइव्ह दाखवल्याबद्दल व त्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले की आरएसएस ही धार्मिक नाही तर सामाजिक संघटना आहे. तसेच दूरदर्शननं काय दाखवायचं व काय नाही याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी प्रसारमाध्यमं जी काँग्रेसच्या काळात दबलेली होती, ती आम्ही मुक्त केली असल्याचा दावा जावडेकरांनी केला आहे.
आमचा लढा शिवसेनेशी नसून आमचा लढा काँग्रेस व राष्ट्रवादीसी असल्याचं सांगत जनता कुशासनाला त्रस्त झाली असल्यानं आम्हाला बहुमतानं निवडून देईल असा विश्वासही जावडेकरांनी व्यक्त केला.
यावेळी शरद पवार यांच्यावर टीका करताना जावडेकर म्हणाले की शरद पवार पावणेपाच वर्षे सेक्युलर असतात, आणि निवडणुका आल्या की तीन महिने अत्यंत जातीयवादी असतात. मोदींवर शरद पवार करत असलेली टीका म्हणजे ते या निवडणुकांना अत्यंत घाबरत असल्याचे द्योतक असल्याचे जावडेकर म्हणाले.