शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

सेनेचा मोदींबाबतच्या भूमिकेचा घोळ कायम

By admin | Updated: October 16, 2014 05:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करायचे किंवा कसे याबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनातील घोळ निवडणुकीच्या अखेरपर्यंत कायम राहिला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करायचे किंवा कसे याबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनातील घोळ निवडणुकीच्या अखेरपर्यंत कायम राहिला. मोदींवर टीका करायची आहे; मात्र त्याच्या परिणामांबाबत नेमका अंदाज येत नाही अशा द्विधा मन:स्थितीत शिवसेना गुरफटल्याचे दिसून आले.शिवसेना-भाजपा युती तुटली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करायचे नाही. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना धारेवर धरायचे, असे राजकीय धोरण ठरले होते. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्राला मुलाखत देऊन ‘चहावाला पीएम होऊ शकतात तर मी सीएम का होऊ शकत नाही’, अशी शेरेबाजी केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींच्या ‘चहावाला’ असण्याबाबत उल्लेख केला होता. शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव यांच्या या टीकेचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर रात्री उशिरा मोदींचा ‘चहावालाह्ण हा उल्लेख ठेवायचा की काढून टाकायचा यावरून शिवसेनेत बराच खल सुरु होता. अखेरीस मथळ््यातील ‘चहावालाह्ण हा उल्लेख काढून मुलाखतीच्या एका उत्तरातील उल्लेख ठेवला गेला. शिवसेना नेतृत्वाने मोदींवर अशी टीका केली तर ते आपल्या पथ्यावर पडेल, असे भाजपाच्या नेत्यांना वाटत होते. त्याचवेळी शिवसेनेच्या हिंदी मुखपत्रातील एका स्तंभामध्ये मोदींच्या वडिलांचा अनुदाराने उल्लेख केला गेला. त्याच्याशी आपला संबंध नसून मोदी यांच्याबद्दल आपल्याला आजही आदर आहे, असा खुलासा शिवसेना नेतृत्वाने मंगळवारी दुपारी केला होता. त्यानंतर त्या स्तंभ लेखकाने सर्व जबाबदारी आपली असल्याचे स्पष्ट करून शिवसेना नेतृत्वाची सुटका केली. त्यानंतर लागलीच नवा घोळ सुरु झाला. मोदींवर टीका करायची तर आहे. मात्र त्याचे बुधवारी होणाऱ्या मतदानावर काय परिणाम होतील, याचा अंदाज येत नाही अशा गोंधळात शिवसेना नेतृत्व निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सापडल्याचे दिसले.