शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

निम्म्या कारखान्यांत प्रभारी एम.डी.

By admin | Updated: November 5, 2014 23:37 IST

राज्यभरातील स्थिती : शासनच उदासीन; नियुक्ती पॅनेल दहा वर्षे गायब

विश्वास पाटील - कोल्हापूर -राज्यातील १६५ सहकारी साखर कारखान्यांपैकी सुमारे ५० टक्क्यांहून अधिक कारखान्यांचा कारभार आता प्रभारी कार्यकारी संचालकांच्या हातात आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे कार्यकारी संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) नियुक्तीसाठी आवश्यक असलेले पॅनेलच गेली दहा वर्षे रखडले आहे. त्यामुळे नवीन अधिकारी मिळत नाहीत. परिणामी सध्या उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांनाच प्रभारी म्हणून जबाबदारी देऊन कारखाना चालविण्यात येतो. प्रभारी अधिकाऱ्यांतील बहुतांशी चांगले असले तरी अनेक नामधारी असून सत्तारूढ गटाच्या हातातील बाहुले म्हणूनच त्यांच्याकडून कारभार होतो. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत येण्यास हेदेखील महत्त्वाचे कारण बनले आहे. ‘एम.डी.’ पदाला साखर कारखानदारीत वेगळे महत्त्व आहे.नवे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच कारखान्यांचा कार्यकारी संचालक शासनाचा अधिकारी असेल, अशी व्यवस्था करण्याचा विचार असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकारी संचालक नियुक्तीची प्रक्रिया व सद्य:स्थिती काय आहे, यासंबंधीची माहिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. एम.डी. नियुक्तीसाठी राज्य शासनाने निवड समिती स्थापन केलेली आहे. त्यामध्ये साखर आयुक्त अध्यक्ष, राज्य साखर संघाचे कार्यकारी संचालक सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महाप्रबंधक सदस्य, एम.डी. असोसिएशनचे दोन सदस्य, साखर संचालक प्रशासन यांचा एक सदस्य असतो. ही समिती परीक्षा व मुलाखती घेऊन निवड सूची तयार करत असे. कारखान्यांतीलच चीफ अकौटंट, चीफ केमिस्ट, चीफ इंजिनिअर, सेक्रेटरी किंवा शेती अधिकारी, लेबर आॅफिसर असे पाच वर्षे खातेप्रमुख असलेले लोक या परीक्षेला बसू शकतात. त्यातील कोणता अधिकारी नियुक्त करायचा हे अधिकार संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनास असतो. त्यांचा कालावधी किमान पाच वर्षे राहील व व्यवस्थापनास वाटल्यास ते मुदतवाढ देऊ शकतात; परंतु मुदतीपूर्वी पदावरून काढायचे झाल्यास साखर आयुक्तांची परवानगी आवश्यक असते.सूची तयार केल्याशिवाय अधिकारी मिळणार नाहीत; परंतु महाराष्ट्रात दहा वर्षांहून अधिक वर्षे ही सूचीच तयार केलेली नाही. साधारणत: २००२ मध्ये सूची तयार करण्याची प्रक्रिया न्यायालयात गेल्याने सगळेच ठप्प झाले. शासन प्रत्येकवेळी न्यायालयाकडे बोट दाखवून बाजू काढत राहिले. ही प्रक्रिया पुन्हा साखर आयुक्त विजय सिंघल यांच्या काळात डिसेंबर २०१३ ला सुरू झाली; परंतु पुन्हा डिस्टलरी मॅनेजर यांना विभागप्रमुख समजायचे का, हा वाद झाल्याने पुन्हा ही प्रक्रिया रखडली आहे.केंद्र व राज्य शासनाने साखर धंदाचनियंत्रणमुक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा सरकारी अधिकारी देऊन कारखानदारीच्या पायात बेड्या घालण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया कारखानदारीतून व्यक्त होत आहे. जिथे असे अधिकारी नियुक्त केले आहेत तिथे ही कारखानदारी फार बळकट झाल्याचा अनुभव नाही. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांची सूची कशी तातडीने तयार होईल याकडे शासनाने अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त झाली.काय असते वेतनश्रेणी...साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकास शासनाच्या प्रथम वर्ग अधिकाऱ्याच्या वेतनाइतके वेतन मिळते. त्यास सहावा वेतन आयोग लागू आहे. किमान ८० हजार व इतर भत्ते असा पगार त्यांना मिळतो. त्यातही पाच वर्षे कामाचा अनुभव असल्यास वरिष्ठ व त्यापेक्षा कमी अनुभव असल्यास कनिष्ठ अशी वर्गवारी असून त्यानुसार वेतन मिळते.असे आहे असोसिएशनराज्यातील कार्यकारी संचालकांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना मॅनेजिंग डायरेक्टर असोसिएशन असे अधिकृत असोसिएशन आहे. तिचे साखर आयुक्त हे अध्यक्ष असतात. सोलापूर जिल्ह्णातील पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एन. निबे हे कार्याध्यक्ष, तर चारुदत्त देशपांडे हे सचिव आहेत. कार्यकारी संचालकांच्या प्रश्नांसाठी ही असोसिएशन सतत प्रयत्नशील असते.परराज्यांत काय स्थिती...कर्नाटक : उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारीउत्तर प्रदेश : आयएएस दर्जाचा अधिकारीगुजरात : कारखान्याचे व्यवस्थापन नियुक्त करते.राज्यातील सहकारी साखर कारखाने १६५त्यातील सुरू असलेले कारखाने : ११०प्रभारी एम.डी. असलेले कारखाने : ८० हून अधिक