शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

महापौरपदासाठी खलबते

By admin | Updated: February 25, 2017 05:16 IST

मुंबईत सर्वाधिक जागा निवडून आल्या तरी शिवसेना आणि भाजपाला जादुई आकडा गाठता आलेला नाही़

मुंबई : मुंबईत सर्वाधिक जागा निवडून आल्या तरी शिवसेना आणि भाजपाला जादुई आकडा गाठता आलेला नाही़ निवडून आलेल्या बंडखोरांपैकी एक व तीन अपक्ष असे चार जण गळाला लागूनही शिवसेनेला बहुमतासाठी २६ जागा कमी पडत आहेत़ त्यामुळे पुन्हा भाजपाचीच साथ घ्यायची की अन्य पर्याय शोधायचा, याची चाचपणी वरिष्ठ पातळीवर शिवसेनेत सुरू झाली आहे़ महापौरपदासाठी आतुर भाजपातही भेटीगाठी व खलबते सुरू आहेत़ त्यामुळे निवडणुकोत्तर चर्चांचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले आहे. अटीतटीच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकून पहिला नंबर पटकावला. परंतु अन्य पक्षांशी, अपक्षांशी हातमिळवणी केल्याशिवाय शिवसेनेला महापालिकेवर पुन्हा भगवा फडकविता येणार नाही़ अशावेळी भाजपा हाच पर्याय ठेवावा का, यावर शिवसेनेत उलटसुलट चर्चा सुरू आहे. जादुई आकडा गाठू शकलेली नसली, तरी भाजपाची मुंबईत वाढलेली ताकद शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे़

महापौरपदासाठी भाजपानेही जमवाजमव सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर खलबते सुरू आहेत़ बरोबरीत असलेल्या उभय पक्षांमध्ये युतीचा फायदा व नुकसान चाचपून मगच त्यावर अंतिम फैसला होण्याचे संकेत आहेत़ चार अपक्ष शिवसेनेच्या गोटात भाजपापेक्षा केवळ दोन जागा अधिक मिळवणाऱ्या शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे़ त्यामुळे एकीकडे युतीबाबत विचार होत असताना दुसरीकडे अपक्ष व विजयी बंडखोरांनाही जवळ केले जात आहे़ त्यामुळे मुंबई महापालिकेचा निकाल लागून २४ तास उलटण्याआधी शिवसेनेच्या गळाला चार नगरसेवक लागले आहेत़ यामध्ये दोन शिवसेनेचे बंडखोर असून दोन अपक्ष आहेत़ एकत्र येणे हाच पर्याय -गडकरी मुंबईत भाजप-शिवसेनेने झालं गेलं विसरून एकत्र येण्यावाचून सध्या तरी पर्याय नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी मुंबईतील युतीबाबत सुतोवाच केले. शिवसेनेसोबत भाजपाची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झालेली आहे. दोघांत वैचारिक मतभेत नाहीत. निवडणुकीत मतभेद असले तरी ते टोकाचे नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

अडीच वर्षे वाटून घ्या - आठवलेमहापालिकेत सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना-भाजपाने एकत्र येऊन अडीच अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबईत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झालेला आहे. शिवसेनेने काँग्रेसचे समर्थन घेऊ नये, असे म्हणत दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन पहिला महापौर कुणाचा? हे ठरवावे असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात युती तोडा मग पाहू -चव्हाणशिवसेनेची भाजपाबरोबर असलेली राज्यातील युती तुटल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा विचार करता येईल, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. ‘सध्या तरी पालिकेत बहुमत मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपा काय भूमिका घेतात, याकडे आमचे लक्ष आहे,’ असे ते म्हणाले.मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या अन्य पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने तातडीची बैठक घेतली. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर चव्हाण यांनी प्रसार माध्यमांसमोर हे वक्तव्य केले. ‘आमची भूमिका सध्या तरी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची आहे. शिवसेना आणि भाजपाचे राज्यात एकत्र सरकार आहे. त्यामुळे आधी त्यांनी निर्णय घ्यायचाय की त्यांना एकत्र राहायचे आहे की नाही. आम्ही तर तिसरा पक्ष आहोत. त्यामुळे आता काहीही सांगणे योग्य नाही,’ असे अशोक चव्हाण म्हणाले‘कोणत्याही स्थितीत मुंबईच्या महापौरपदावरील दावा सोडता कामा नये, मुंबईत भाजपाचाच महापौर विराजमान झाला पाहिजे,’ अशा स्पष्ट सूचना करणारा फोन भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेतृत्वाला केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले. त्यामुळे मुंबईतील सत्तेची समीकरणे अधिक गडद झाली. उद्धव ठाकरे आज करणार चर्चाभाजपाशी पुन्हा युती करायची वा नाही, हे ठरविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये सर्व नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक उद्या, शनिवारी दुपारी ४ वाजता बोलाविली आहे. त्यांना काय व्हावे असे वाटते? ते उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. बैठक झाल्यानंतरही निर्णय लगेचच जाहीर केला जाण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.आधी युती तोडा, मग पाहू - चव्हाणसेनेची भाजपाबरोबर असलेली राज्यातील युती तुटल्यानंतर मुंबई महापालिकेत सेनेला पाठिंबा देण्याबाबतचा विचार करता येईल, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.