शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी शेतक-याने काढले स्वत:चे अवयव विक्रीला

By admin | Updated: November 7, 2015 02:59 IST

शेगाव येथे पत्रकार परिषदेत दुष्काळग्रस्त शेतक-याने ठेवला महावितरणवर ठपका.

शेगाव (जि. बुलडाणा): आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी वीज कनेक्शन मिळाले नाही व दुसरीकडे कर्जाची रक्कम बँकेकडून वसूल करण्यास सुरुवात झाल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍याने कर्जमुक्तीसाठी चक्क स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीस काढल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. बँकेकडून कर्ज घेऊन शेतात विहीर खोदली. पाणीही भरपूर लागले. यामुळे बागायत होणार असल्याने आपले दिवस पालटतील, अशी आशा घेऊन बसलेल्या शेगाव तालुक्यातील दिलीप भाऊराव देशमुख या शेतकर्‍याने पत्रकार परिषद आयोजित करून ही घोषणा केली. आपली व्यथा व्यक्त करताना देशमुख यांनीसांगितले, माझी शेगाव तालुक्यातील वरखेड खु. (जि. बुलढाणा) शिवारात शेती असून, शेत बागायती करण्याचे ठरविले. शेतातील ढासळलेली विहीर नव्याने बांधण्यासाठी शेगावच्या कृषी विभागाकडे चकरा मारल्या; मात्र यासाठी कुठलीच योजना नसल्याचे सांगण्यात आले. स्वत: पाच लाख रुपये खर्च करून विहीर उभारण्याचे प्रयत्न केले. तरीही पैसा कमी पडल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेगाव शाखेतून शेत गहाण ठेवून दोन लाख रुपये कर्ज सहा महिन्यांपूर्वी घेतले व विहीर तयार केली. सुदैवाने स्वत:च्या शेतासोबतच आजूबाजूच्या शेतकर्‍यांनाही फायदा होईल असे मुबलक पाणी आहे. ह्य४0 दिवसांत शेतकर्‍यांना वीज कनेक्शनह्ण ही शासनाची घोषणा असताना आठ महिन्यांपासून महावितरण कंपनीच्या शेगाव कार्यालयात चकरा मारत आहे; मात्र आज या, उद्या या याशिवाय कुठलेच उत्तर मिळालेले नाही व रबीचा हंगामही निघून जात आहे. त्यातच बँकेने कर्ज वसुली सुरू केल्याने कर्ज भरण्यासाठी आता शरीरातील एक किडनी, एक डोळा व जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेले अवयव वगळता इतर अवयव विकण्याच्या मानसिकतेत आहे. आपण सदर अवयव आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, जखमी सैनिक, पोलीस यांना दान करण्यासाठी तयार आहोत. कर्जफेड तर करायची आहे; परंतु दुसरं साधन नाही. ऐपतही नाही. त्यामुळं आपल्या अवयवांची विक्री करून कर्जफेड करून घ्या, असं म्हणत या शेतकर्‍याने किडनीसारख्या अन्य अवयवांची विक्री करण्याची परवानगी द्यावी, त्या बदल्यात शासनाने आपल्यावरील कर्ज फेडून घ्यावे, असे आवाहन केले. शेतकर्‍यांना मदत करण्याची आश्‍वासने सरकार देत असली तरी त्यांची अंमलबजावणी महावितरण कंपनी करीत नसल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.