शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कर्जमुक्तीसाठी शेतक-याने काढले स्वत:चे अवयव विक्रीला

By admin | Updated: November 7, 2015 02:59 IST

शेगाव येथे पत्रकार परिषदेत दुष्काळग्रस्त शेतक-याने ठेवला महावितरणवर ठपका.

शेगाव (जि. बुलडाणा): आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी वीज कनेक्शन मिळाले नाही व दुसरीकडे कर्जाची रक्कम बँकेकडून वसूल करण्यास सुरुवात झाल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍याने कर्जमुक्तीसाठी चक्क स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीस काढल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. बँकेकडून कर्ज घेऊन शेतात विहीर खोदली. पाणीही भरपूर लागले. यामुळे बागायत होणार असल्याने आपले दिवस पालटतील, अशी आशा घेऊन बसलेल्या शेगाव तालुक्यातील दिलीप भाऊराव देशमुख या शेतकर्‍याने पत्रकार परिषद आयोजित करून ही घोषणा केली. आपली व्यथा व्यक्त करताना देशमुख यांनीसांगितले, माझी शेगाव तालुक्यातील वरखेड खु. (जि. बुलढाणा) शिवारात शेती असून, शेत बागायती करण्याचे ठरविले. शेतातील ढासळलेली विहीर नव्याने बांधण्यासाठी शेगावच्या कृषी विभागाकडे चकरा मारल्या; मात्र यासाठी कुठलीच योजना नसल्याचे सांगण्यात आले. स्वत: पाच लाख रुपये खर्च करून विहीर उभारण्याचे प्रयत्न केले. तरीही पैसा कमी पडल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेगाव शाखेतून शेत गहाण ठेवून दोन लाख रुपये कर्ज सहा महिन्यांपूर्वी घेतले व विहीर तयार केली. सुदैवाने स्वत:च्या शेतासोबतच आजूबाजूच्या शेतकर्‍यांनाही फायदा होईल असे मुबलक पाणी आहे. ह्य४0 दिवसांत शेतकर्‍यांना वीज कनेक्शनह्ण ही शासनाची घोषणा असताना आठ महिन्यांपासून महावितरण कंपनीच्या शेगाव कार्यालयात चकरा मारत आहे; मात्र आज या, उद्या या याशिवाय कुठलेच उत्तर मिळालेले नाही व रबीचा हंगामही निघून जात आहे. त्यातच बँकेने कर्ज वसुली सुरू केल्याने कर्ज भरण्यासाठी आता शरीरातील एक किडनी, एक डोळा व जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेले अवयव वगळता इतर अवयव विकण्याच्या मानसिकतेत आहे. आपण सदर अवयव आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, जखमी सैनिक, पोलीस यांना दान करण्यासाठी तयार आहोत. कर्जफेड तर करायची आहे; परंतु दुसरं साधन नाही. ऐपतही नाही. त्यामुळं आपल्या अवयवांची विक्री करून कर्जफेड करून घ्या, असं म्हणत या शेतकर्‍याने किडनीसारख्या अन्य अवयवांची विक्री करण्याची परवानगी द्यावी, त्या बदल्यात शासनाने आपल्यावरील कर्ज फेडून घ्यावे, असे आवाहन केले. शेतकर्‍यांना मदत करण्याची आश्‍वासने सरकार देत असली तरी त्यांची अंमलबजावणी महावितरण कंपनी करीत नसल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.