शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याने काढले अवयव विक्रीला

By admin | Updated: November 8, 2015 00:27 IST

वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीला पाणी देणे शक्य नसताना, विहिरीसाठी काढलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यास बँकेने सुरुवात केल्याने, हताश झालेल्या शेतकऱ्याने

शेगाव (बुलडाणा) : वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीला पाणी देणे शक्य नसताना, विहिरीसाठी काढलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यास बँकेने सुरुवात केल्याने, हताश झालेल्या शेतकऱ्याने कर्जमुक्तीसाठी स्वत:चे अवयवच विक्रीस काढले आहेत.शेगाव तालुक्यातील दिलीप भाऊराव देशमुख यांनी बँकेकडून कर्ज घेऊन शेतात विहीर खोदली. विहिरीला पाणीही भरपूर आहे. बागायत करणे शक्य होणार असल्याने दिवस पालटतील, अशी आशा त्यांना होती. मात्र, आठ महिन्यांपासून ते वीज कनेक्शनसाठी कार्यालयात चकरा मारत आहेत. शेगाव तालुक्यातील वरखेड खु. येथे देशमुख यांची शेती आहे. शेतातील ढासळलेली विहीर नव्याने बांधण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यासाठी कुठलीच योजना नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पाच लाख रुपये खर्च करून विहीर उभारण्याचे प्रयत्न केले. पैसा कमी पडल्याने त्यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शेगाव शाखेतून सहा महिन्यांपूर्वी शेत गहाण ठेवून दोन लाख रुपये कर्ज घेतले व विहीर तयार केली. सुदैवाने त्यांच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. ‘४० दिवसांत शेतकऱ्यांना वीज कनेक्शन’ ही शासनाची घोषणा असताना आठ महिन्यांपासून ते महावितरणच्या शेगाव कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र, त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही. रब्बीचा हंगामही निघून जाईल, अशी त्यांना भीती आहे. (प्रतिनिधी)