शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याने काढले अवयव विक्रीला

By admin | Updated: November 8, 2015 00:27 IST

वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीला पाणी देणे शक्य नसताना, विहिरीसाठी काढलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यास बँकेने सुरुवात केल्याने, हताश झालेल्या शेतकऱ्याने

शेगाव (बुलडाणा) : वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीला पाणी देणे शक्य नसताना, विहिरीसाठी काढलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यास बँकेने सुरुवात केल्याने, हताश झालेल्या शेतकऱ्याने कर्जमुक्तीसाठी स्वत:चे अवयवच विक्रीस काढले आहेत.शेगाव तालुक्यातील दिलीप भाऊराव देशमुख यांनी बँकेकडून कर्ज घेऊन शेतात विहीर खोदली. विहिरीला पाणीही भरपूर आहे. बागायत करणे शक्य होणार असल्याने दिवस पालटतील, अशी आशा त्यांना होती. मात्र, आठ महिन्यांपासून ते वीज कनेक्शनसाठी कार्यालयात चकरा मारत आहेत. शेगाव तालुक्यातील वरखेड खु. येथे देशमुख यांची शेती आहे. शेतातील ढासळलेली विहीर नव्याने बांधण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यासाठी कुठलीच योजना नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पाच लाख रुपये खर्च करून विहीर उभारण्याचे प्रयत्न केले. पैसा कमी पडल्याने त्यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शेगाव शाखेतून सहा महिन्यांपूर्वी शेत गहाण ठेवून दोन लाख रुपये कर्ज घेतले व विहीर तयार केली. सुदैवाने त्यांच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. ‘४० दिवसांत शेतकऱ्यांना वीज कनेक्शन’ ही शासनाची घोषणा असताना आठ महिन्यांपासून ते महावितरणच्या शेगाव कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र, त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही. रब्बीचा हंगामही निघून जाईल, अशी त्यांना भीती आहे. (प्रतिनिधी)