शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी महत्वाची की सेफ्टी ?

By admin | Updated: July 12, 2017 22:18 IST

निसर्ग सौदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यात हलक्या हलक्या पाऊसच्या सरी कोसळू लागताच निसर्ग प्रेमी लोकांचे पाय तालुक्यातील माळशेज घाट

आनंद कांबळे/ ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 -  निसर्ग सौदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यात हलक्या हलक्या पाऊसच्या सरी कोसळू लागताच निसर्ग प्रेमी लोकांचे पाय तालुक्यातील माळशेज घाट  जीवधन चावंड हडसर निमगिरी यांसारखे किल्ले व नाणेघाट आंबोली परिसर यासारख्या ठिकाणी वळतात.
 
अलीकडच्या काळात पावसाळ्यात माळशेज घाटात झालेल्या दुर्घटना पाहता पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर नाणेघाट व परिसारकडे दिसतो या पर्यटकांमध्ये शहरी पर्यटकांची संख्या जास्त असते नानेघाटातील नानाचा अंगठा व रिव्हर्स पॉईंट पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत
 
या ठिकाणी वर्षा विहारासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यात स्वतःला सोशल मीडियावर अपडेट करण्यासाठी या ठिकाणी सर्रास सेल्फी काढण्याचे प्रकार चालू असतात
 
नानाचा अंगठा रिव्हर्स पॉईन्ट या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती पाहता याठिकाणी सेल्फी काढणे अतिशय धोकादायक आहे एका बाजूने असणारी खोल दरी मुसळदार पाऊस जोराचा वारा निसरडी जागा अशा प्रतिकूल परिस्थितीत सेल्फीसाठी चढाओढ सुरु असते
 
यातून एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासनाने याठिकाणी संरक्षक कठडे बसवावेत आणि याठिकानाला नो सेल्फी झोन घोषित करावे अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.
 
जुन्नर तालुक्याला छत्रपती शिवरायांचा जसा ईतिहास आहे तसाच जुन्नर तालुका निसर्ग सौंदर्याने सुद्धा ओतप्रोत भरलेला व नटलेला आहे. या व ईतर कारणांमुळे महाराष्ट्रातील पर्यटक गेली ४/५ वर्षांपासून जुन्नरकडे आकर्षित झाला आहे. पावसाळा व हीवाळा या ऋतूत विशेषत: पर्यटकांचा ओघ माळशेज घाट,भैरवगड,हरिश्चंद्रगड, पिंपळगाव जोगा धरण परीसर,किल्ले शिंदोळा,हटकेश्वर, शिवनेरी, लेण्याद्री व ईतर अनेक लेणी समूह,किल्ले हडसर,किल्ले चावंड, कुकडेश्वर,किल्ले जिवधन, सातवाहन कालीन नाणेघाट(सुमारे २२०० ते २३०० वर्षापूर्विचा ),दार्याघाट व अंबोली परिसरातील धबधबे, किल्ले नारायणगड,ओझर, चैतन्य महाराज(तुकाराम महाराजांचे गुरू)यांची ओतूर येथील समाधी मंदिर, गुप्त विठोबा मंदिर,आणे घाटातील नैसर्गिक पुल ई.निसर्गरम्य, ऐतिहासिक व अध्यात्मिक स्थळांना भेट देण्यासाठी वाढू लागला आहे.ही बाब जुन्नर तालुका पर्यटनासाठी निश्चितच चांगली आहे.
पण निसर्ग, गड-किल्ले, विविध जलाशय(तालुक्यात५ जलाशय आहेत) या स्थळांना भेट देणार्या सर्वच पर्यटकांमध्ये निसर्गाचा आनंद अनुभवणे,ऐतिहासिक वारसा जाणून घेणे, पर्यावरणाविषयी जागृती या गोष्टी असतीलच असे नाही.
जुन्नर तालुक्यात पर्यटक म्हणून येताय... आपले स्वागतच आहे.पण काही गोष्टींची खबरदारी व स्वतःच्या जीवाची काळजी मात्र घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला मोबाईल मधे फोटो(सेल्फी) काढण्याचा मोह आवरत नाही. जरूर सेल्फी वा ग्रुप फोटो आठवणी जपण्यासाठी काढले पाहिजेत परंतू त्यासाठी योग्य स्थान निवडणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा ती सेल्फी तुमची अंतिम सेल्फी ठरल्याशिवाय राहणार नाही.विशेषतः कोणत्याही किल्ल्यावर जात असताना हा सेल्फी मोह खास ऊसळून येतो.गडाच्या तटबंदीवर, बांधकामांवर तसेच अवशेषांवर चढून व कड्यालगत जाऊन फोटो न काढलेलाच बरा .कारण पावसाळ्यात तटबंदी, बुरुज,ईमारतींचे अवशेष ढासळण्याची शक्यता जास्त असते. अशा ठिकाणी तुमच्या सेल्फीप्रेमाने अपघात होऊ शकतो पण हा अपघात केवळ तुमच्याच जीवावर बेततो एवढेच नाही तर त्या ऐतिहासिक वास्तूची सुद्धा पडझड होते.