शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

स्वाभिमानी संघटना तोंडघशी

By admin | Updated: September 25, 2014 01:14 IST

लढण्यापूर्वीच झटका : शिवसेना-भाजप युतीलाही बसणार फटका

विश्वास पाटील - कोल्हापूर -महायुतीत शिवसेना-भाजप या प्रमुख पक्षांनीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतरही घटकपक्षांना पुरेशा जागा न दिल्याने हे घटकपक्ष महायुतीतून बाहेर पडले. त्यामुळे संघटनेला चांगलाच झटका बसला असून, या घडामोडींमध्ये संघटना तोंडघशी पडल्याचे चित्र पुढे आले आहे. महायुती आकारास यावी यासाठी ज्यांचे योगदान राहिले, त्यांनाच घराबाहेर पडण्याची वेळ आल्याचा अनुभव यानिमित्ताने खासदार राजू शेट्टी यांना आला आहे. ‘स्वाभिमानी’सह राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पक्ष (आठवले) गट यांच्या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय ताकदीचा विचार केल्यास किमान २१ जागांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणजे या ठिकाणच्या लढती महायुतीला जड जाऊ शकतात.जरी आज, बुधवारी सायंकाळपर्यंत झालेल्या घडामोडींनुसार स्वाभिमानी संघटना महायुतीतून बाहेर पडली असली तरी अजूनही समझोता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या सगळ्या पक्षांनी एकत्र यावे, असा जनतेचाच त्यांच्यावर दबाव आहे. ‘स्वाभिमानी’ महायुतीतून बाहेर पडल्यास त्याचा त्यांना जसा फटका बसणार आहे, तसा तो शिवसेना-भाजपलाही नक्कीच बसणार आहे. शिवसेना व भाजपची राज्यात १९९० पासून युती होती. युतीला महायुती करण्यात या तीन पक्षांचे पाठबळ नक्कीच महत्त्वाचे होते. युतीचा पाया ग्रामीण महाराष्ट्रात विस्तारण्याचे काम इतर तीन पक्षांमुळे होणार होते, हे ध्यानात आल्यानेच स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी शेट्टी, महादेव जानकर व रामदास आठवले यांना बरोबरीने घेतले. त्याचा लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच फायदा झाला. मुंडे यांच्यामुळेच ही युती आकारली. त्यामुळे ते असेपर्यंत घटक पक्षांत चांगला समन्वय होता. परंतु, त्यांचे निधन झाले व लोकसभेला मोदी लाटेमुळे दणदणीत विजय मिळाल्यावर दोन प्रमुख पक्षांना घटकपक्षांची गरज वाटेनाशी झाली. आताही घटकपक्षांना जास्त जागा द्यायला लागू नयेत, असाच कावा होता हे स्पष्ट होत आहे.या घडामोडींत शेट्टी यांची जास्त पंचाईत झाली. कारण मुळातच ते जेव्हा भाजपच्या आघाडीत सहभागी झाले, तेव्हा त्यांच्यावर चोहोबाजूंनी कडाडून टीका झाली. शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी हे भाजपमध्ये गेल्यावर स्वतंत्र संघटना काढणारे पुन्हा त्याच वाटेने गेल्याची टीका झाली; परंतु शेट्टी यांनी व्यक्तिगत करिष्म्याने त्यावर मात केली. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल या भावनेने त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. महायुती व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील राहिले; परंतु झाले उलटेच. संघटनेची आतापर्यंतची सगळी वाटचाल स्वबळावर झाली आहे हे खरे असले तरी शेट्टी खासदार झाल्यानंतर संघटनेला दक्षिण महाराष्ट्रात एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. आता कार्यकर्त्यांना आमदारकीचा गुलाल देण्याची संधी आली असताना महायुतीतून अपमानास्पदरीत्या बाहेर पडावे लागणार असल्याने संघटनेलाही त्याचा फटका बसणार आहे.‘स्वाभिमानी’सह तिन्ही प्रमुख घटकपक्ष स्वबळावर अपवाद वगळता एकही जागा निवडून आणू शकत नाहीत हे वास्तव असले तरी, ते युतीच्या उमेदवारांचा नक्कीच पराभव करू शकतात. गत निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेने या चार जिल्ह्यांत १४ जागा लढविल्या. त्यांच्या उमेदवारांना सरासरी १४ टक्के मते मिळाली आहेत, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील एकूण जागा --37