शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

स्वाभिमानी संघटना तोंडघशी

By admin | Updated: September 25, 2014 01:14 IST

लढण्यापूर्वीच झटका : शिवसेना-भाजप युतीलाही बसणार फटका

विश्वास पाटील - कोल्हापूर -महायुतीत शिवसेना-भाजप या प्रमुख पक्षांनीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतरही घटकपक्षांना पुरेशा जागा न दिल्याने हे घटकपक्ष महायुतीतून बाहेर पडले. त्यामुळे संघटनेला चांगलाच झटका बसला असून, या घडामोडींमध्ये संघटना तोंडघशी पडल्याचे चित्र पुढे आले आहे. महायुती आकारास यावी यासाठी ज्यांचे योगदान राहिले, त्यांनाच घराबाहेर पडण्याची वेळ आल्याचा अनुभव यानिमित्ताने खासदार राजू शेट्टी यांना आला आहे. ‘स्वाभिमानी’सह राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पक्ष (आठवले) गट यांच्या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय ताकदीचा विचार केल्यास किमान २१ जागांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणजे या ठिकाणच्या लढती महायुतीला जड जाऊ शकतात.जरी आज, बुधवारी सायंकाळपर्यंत झालेल्या घडामोडींनुसार स्वाभिमानी संघटना महायुतीतून बाहेर पडली असली तरी अजूनही समझोता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या सगळ्या पक्षांनी एकत्र यावे, असा जनतेचाच त्यांच्यावर दबाव आहे. ‘स्वाभिमानी’ महायुतीतून बाहेर पडल्यास त्याचा त्यांना जसा फटका बसणार आहे, तसा तो शिवसेना-भाजपलाही नक्कीच बसणार आहे. शिवसेना व भाजपची राज्यात १९९० पासून युती होती. युतीला महायुती करण्यात या तीन पक्षांचे पाठबळ नक्कीच महत्त्वाचे होते. युतीचा पाया ग्रामीण महाराष्ट्रात विस्तारण्याचे काम इतर तीन पक्षांमुळे होणार होते, हे ध्यानात आल्यानेच स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी शेट्टी, महादेव जानकर व रामदास आठवले यांना बरोबरीने घेतले. त्याचा लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच फायदा झाला. मुंडे यांच्यामुळेच ही युती आकारली. त्यामुळे ते असेपर्यंत घटक पक्षांत चांगला समन्वय होता. परंतु, त्यांचे निधन झाले व लोकसभेला मोदी लाटेमुळे दणदणीत विजय मिळाल्यावर दोन प्रमुख पक्षांना घटकपक्षांची गरज वाटेनाशी झाली. आताही घटकपक्षांना जास्त जागा द्यायला लागू नयेत, असाच कावा होता हे स्पष्ट होत आहे.या घडामोडींत शेट्टी यांची जास्त पंचाईत झाली. कारण मुळातच ते जेव्हा भाजपच्या आघाडीत सहभागी झाले, तेव्हा त्यांच्यावर चोहोबाजूंनी कडाडून टीका झाली. शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी हे भाजपमध्ये गेल्यावर स्वतंत्र संघटना काढणारे पुन्हा त्याच वाटेने गेल्याची टीका झाली; परंतु शेट्टी यांनी व्यक्तिगत करिष्म्याने त्यावर मात केली. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल या भावनेने त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. महायुती व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील राहिले; परंतु झाले उलटेच. संघटनेची आतापर्यंतची सगळी वाटचाल स्वबळावर झाली आहे हे खरे असले तरी शेट्टी खासदार झाल्यानंतर संघटनेला दक्षिण महाराष्ट्रात एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. आता कार्यकर्त्यांना आमदारकीचा गुलाल देण्याची संधी आली असताना महायुतीतून अपमानास्पदरीत्या बाहेर पडावे लागणार असल्याने संघटनेलाही त्याचा फटका बसणार आहे.‘स्वाभिमानी’सह तिन्ही प्रमुख घटकपक्ष स्वबळावर अपवाद वगळता एकही जागा निवडून आणू शकत नाहीत हे वास्तव असले तरी, ते युतीच्या उमेदवारांचा नक्कीच पराभव करू शकतात. गत निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेने या चार जिल्ह्यांत १४ जागा लढविल्या. त्यांच्या उमेदवारांना सरासरी १४ टक्के मते मिळाली आहेत, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील एकूण जागा --37