शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

स्वार्थी लोकांनी रखडवले गुंजवणी धरण

By admin | Updated: September 21, 2016 02:05 IST

पाण्याचा पुरेपूर फायदा आपल्याच भागाला मिळावा, या स्वार्थी भावनेतून काही जणांनी धरणाचे काम अनेक वर्षे रखडवले होते.

भोर : ‘‘गुंजवणी-चापेट धरणातील पाण्याचा पुरेपूर फायदा आपल्याच भागाला मिळावा, या स्वार्थी भावनेतून काही जणांनी धरणाचे काम अनेक वर्षे रखडवले होते. मात्र, युती सरकारने धरणाचे काम हाती घेऊन टग्यांना चांगला धडा शिकवला आहे,’’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.भोरमधील तालुका शिवसेनेतर्फे शेतकरी मेळावा, शाखा उद्घाटन व धोमबलकवडी कालव्यात संपादित केलेल्या जमिनीचे धनादेश वाटप शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, सत्यवान उभे, दत्तात्रय टेमघरे, बाळासाहेब चांदेरे, केदार देशपांडे, युवराज जेधे, भालचंद्र मळेकर, रमेश कोंडे, किरण पवार, अमित शेवते, दीपक बर्डे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाप्रमुख माऊली शिंदे यांनी केले.धोमबलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने पाण्याची गळती होत आहे.पावसाळ्यात कालवा फुटून स्थानिक शेतकऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी वडतुंबी येथील शेतकरी बबन साळेकर यांनी केली. तर कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला कमी मिळाला असल्याची तक्रार चंद्रकांत चिकणे यांनी केली.धोमबलकवडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी वडतुंबी नेरे, धोंडवाडी, म्हाकोशी, टिटेघर, रावडी, बाजारवाडी, कर्नावड, धावडी गावांतील संपादित केलेल्या जमिनीचा ६ कोेटी १३ लाख ४५२ रुपये धनादेशाचे वाटप शेतकऱ्यांना शिवतारे व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. >गुंजवणीचे ६० टक्के पाणी बारामतीला, तर ४० टक्के पाणी माळशिरसला मिळावे म्हणून धरणाचे कामच आघाडी सरकारच्या काळात थांबवून तसे ठरावही करण्यात आले होते. मात्र, युती सरकार सत्तेवर आल्यावर तत्काळ धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, गुंजवणीचे पाणी पळविण्याचा डाव युती सरकार साकार होऊ देणार नाही. मात्र भोर, वेल्हे तालुक्याचे हक्काचे पाणी ठेवून राहिलेले पाणी पुरंदरला देण्यात येईल. युती शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी मोठा निधी मंजूर केला असून, सुमारे १८ टक्के पाणीसाठा झाला आहे. - विजय शिवतारे, जलसंपदामंत्री