शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

स्वार्थी लोकांनी रखडवले गुंजवणी धरण

By admin | Updated: September 21, 2016 02:05 IST

पाण्याचा पुरेपूर फायदा आपल्याच भागाला मिळावा, या स्वार्थी भावनेतून काही जणांनी धरणाचे काम अनेक वर्षे रखडवले होते.

भोर : ‘‘गुंजवणी-चापेट धरणातील पाण्याचा पुरेपूर फायदा आपल्याच भागाला मिळावा, या स्वार्थी भावनेतून काही जणांनी धरणाचे काम अनेक वर्षे रखडवले होते. मात्र, युती सरकारने धरणाचे काम हाती घेऊन टग्यांना चांगला धडा शिकवला आहे,’’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.भोरमधील तालुका शिवसेनेतर्फे शेतकरी मेळावा, शाखा उद्घाटन व धोमबलकवडी कालव्यात संपादित केलेल्या जमिनीचे धनादेश वाटप शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, सत्यवान उभे, दत्तात्रय टेमघरे, बाळासाहेब चांदेरे, केदार देशपांडे, युवराज जेधे, भालचंद्र मळेकर, रमेश कोंडे, किरण पवार, अमित शेवते, दीपक बर्डे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाप्रमुख माऊली शिंदे यांनी केले.धोमबलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने पाण्याची गळती होत आहे.पावसाळ्यात कालवा फुटून स्थानिक शेतकऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी वडतुंबी येथील शेतकरी बबन साळेकर यांनी केली. तर कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला कमी मिळाला असल्याची तक्रार चंद्रकांत चिकणे यांनी केली.धोमबलकवडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी वडतुंबी नेरे, धोंडवाडी, म्हाकोशी, टिटेघर, रावडी, बाजारवाडी, कर्नावड, धावडी गावांतील संपादित केलेल्या जमिनीचा ६ कोेटी १३ लाख ४५२ रुपये धनादेशाचे वाटप शेतकऱ्यांना शिवतारे व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. >गुंजवणीचे ६० टक्के पाणी बारामतीला, तर ४० टक्के पाणी माळशिरसला मिळावे म्हणून धरणाचे कामच आघाडी सरकारच्या काळात थांबवून तसे ठरावही करण्यात आले होते. मात्र, युती सरकार सत्तेवर आल्यावर तत्काळ धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, गुंजवणीचे पाणी पळविण्याचा डाव युती सरकार साकार होऊ देणार नाही. मात्र भोर, वेल्हे तालुक्याचे हक्काचे पाणी ठेवून राहिलेले पाणी पुरंदरला देण्यात येईल. युती शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी मोठा निधी मंजूर केला असून, सुमारे १८ टक्के पाणीसाठा झाला आहे. - विजय शिवतारे, जलसंपदामंत्री