शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

एसआरएच्या ‘त्या’ घरांवर जप्तीचे संकट

By admin | Updated: January 10, 2017 04:29 IST

मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गतची (एसआरए) जी घरे दहा वर्षे पूर्ण होण्याआधीच विकण्यात आली त्यांना हस्तांतर शुल्क घेऊन

मुंबई : मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गतची (एसआरए) जी घरे दहा वर्षे पूर्ण होण्याआधीच विकण्यात आली त्यांना हस्तांतर शुल्क घेऊन नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होऊ शकला नाही. त्यामुळे अशा ६३ हजार घरांवर जप्तीचे संकट कायम आहे. ही घरे ताबा मिळाल्यापासून दहा वर्षांच्या आत विकता येणार नाहीत, अशी एसआरएची अट असताना हजारो घरे विकण्यात आली. अशी घरे जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तथापि, ही घरे हस्तांतरण शुल्क आकारुन नियमित करावीत, अशी भूमिका मुंबई भाजपाने घेतली होती. तथापि, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ न करता राज्य सरकारने उपसमितीची मात्रा शोधली आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की असा निर्णय घेतला तर तो न्यायालयाचा अवमान असेल असे स्पष्ट मत विधी व न्याय विभागाने तसेच गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निदर्शनास आणून दिले. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही घरे जप्त करुन रोष ओढावणे राज्य सरकारला राजकीयदृष्ट्या नक्कीच परवडणारे नसल्याने आता मंत्रिमंडळ उपसमितीची मात्रा काढण्यात आली आहे. उद्या, राज्य सरकारने ही घरे हस्तांतरण शुल्क आकारून नियमित करण्याची भूमिका घेतली तर ती न्यायालयात टिकेल का हा प्रश्न आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी पत्रकारांना सांगितले की ज्यांनी घरे विकत घेतली त्यांच्याकडून हस्तांतरण शुल्क घेऊन ती नियमित करण्याबाकबत उपसमिती विचार करेल. संक्र मण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरुंना आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन सदनिका देण्यासह अशा शिबिरातील अनिधकृत रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेतून सदनिका देण्यासंदर्भात धोरण ठरविण्याचे काम उपसमिती करेल. स्वत: मेहता हे या समितीचे अध्यक्ष असतील. त्यात शिक्षण मंत्री विनोद तावडे व परिवहन दिवाकर रावते यांच्यासह राज्यमंत्री रविंद्र वायकर, श्रीमती विद्या ठाकूर आणि रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. समन्वयक म्हणून गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव काम पाहणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)