शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

सातबारे तपासा, किती शेतकरी मंत्री आहेत हे कळेल!

By admin | Updated: June 8, 2017 06:28 IST

भाजपाच्या मंत्रिमंडळात शेतकरी किती आहेत, असे निरर्थक सवाल करणाऱ्यांनी भाजपाच्या मंत्र्यांचे सातबारे तपासून पहावेत

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपाच्या मंत्रिमंडळात शेतकरी किती आहेत, असे निरर्थक सवाल करणाऱ्यांनी भाजपाच्या मंत्र्यांचे सातबारे तपासून पहावेत, म्हणजे त्यांना खरे काय ते कळेल, असा जोरदार हल्ला कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी चढवला. भाजपा सरकारचे मंत्री शेतकरी आहेत का? असा प्रश्न शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला होता. त्याला फुंडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.सरकार शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे व त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहे हे पाहून विरोधकांनी यात राजकारण आणणे सुरू केले आहे. वस्तुत: त्यांना शेतकऱ्यांना काही मिळूच द्यायचे नाही, असा टोलाही फुंडकर यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसला लगावला. दोन्ही काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना पुढे करून राजकारण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.खा. राजू शेट्टींचे वर्चस्व कमी करण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुढे करत मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. खोत यांना शेतकरी संघटनेतून काढून टाकण्यासाठी खा. शेट्टी यांच्यावर दबाव आणणे सुरू केल्याचे संघटनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेलाही या निर्णयापासून दूर ठेवले. आता संपाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, असे शेतकऱ्यांनी जाहीर केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने देऊ केलेल्या कथित पाठिंब्याची हवाच निघून गेली आहे.>भाज्यांची आवक सुरळीतगेल्या काही दिवसांपासून घटलेली भाज्यांची आवक सुरळीत होत आहे. पुणे, नवी मुंबईसह नाशिकच्या बाजार समितीमध्ये बुधवारी भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने भाज्यांचे भावही कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तीन ते चार दिवसांपासून अनेक भाज्यांनी शंभरी गाठली होती. मात्र आता तेच दर झपाट्याने कमी होत आहेत.शेतकरी संपाबद्दल अभिनेता मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी बुधवारी या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यासाठी मैदानात उतरावे लागू नये. तशी वेळ त्यांच्यावर येणे हे दुर्दैवाचे आहे, असे यावेळी नाना पाटेकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जेवढे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तेवढा हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता नाना यांनी व्यक्त केली. मकरंद अनासपुरे म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यायला हवे, त्यांनी शेतकऱ्यांचा फुटबॉल करू नये, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, अशी मागणी करतानाच, आम्हाला पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार नको पण शेतकऱ्यांसाठी जे करता येईल ते करा, असे भावनिक आवाहनही मकरंदने केले.