शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण

By admin | Updated: July 1, 2016 02:59 IST

शुक्रवार १ जुलै या कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे

अलिबाग : शुक्रवार १ जुलै या कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे. याच दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने अत्यंत आगळ््यावेगळ््या ‘गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा बीजारोपण मोहिमेचे’ आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आयोजित या मोहिमेत पाली येथील पालीवाला कॉलेजचे विद्यार्थी उपप्राचार्य प्रा.सुधीर पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली १००० बियांचे रोपण करणार आहेत, तर पोलादपूर येथील एस.एम.कॉलेजचे विद्यार्थी पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावर बीजारोपण करण्याकरिता बिया वाटप करणार असल्याची माहिती शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांनी दिली आहे.विसावा (महाड) येथे १० हजार बियांची उपलब्धता सफर केंद्र व सावली गोशाळेचे संचालक गणराज जैन व अ‍ॅड.अर्चना जैन यांनी केली आहे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबागचे प्रमुख आल्हाद पाटील यांनी तितक्याच बियांची उपलब्धता ठेवली आहे.बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी आठ वाजता विसावा (महाड) येथे महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले व शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पळस्पे (पनवेल) येथे माजी आमदार विवेक पाटील व व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन,खिडकी-अलिबागचे प्रमुख आल्हाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच वेळी होणार आहे.विसावा (महाड) येथील उपक्रमाकरिता सफर केंद्र आणि सावली गोशाला, आसनपोई-महाड आणि शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड या दोन संस्थांचे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबाग व भारत पेट्रोलियम वैभव आॅटोमोबाईल्स, पळस्पे-पनवेल या दोन संस्थांचे सहकार्य लाभले आहे.>बियांची नैसर्गिक रुजवात ८० टक्केबीजारोपण ही वृक्ष आणि वन संवर्धनाकरीता अत्यंत शास्त्रशुद्ध आणि प्रभावी प्रक्रीया आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून ही गोवा राष्ट्रीय माहामार्गाच्या दूतर्फा आगळी मोहीम हाती घेण्यात आल्याचे कळल्यावर खरच आनंद वाटला. हि मोहीम वैशिष्ठ्यपूर्ण आहे. बीया एके ठिकाणी रुजवून त्याची लागवड अन्यत्र करणे या प्रक्रीयेमध्ये रोपांची मर्तूक मोठ्या प्रमाणात होते असा आजवरचा अनूभव आहे. परंतू फणस, करंज, जांभूळ, आबा यांच्या बीयाच थेट लावल्या तर त्यांची रुजवात पावसाळ््यात ८० टक्के होते, हे निष्कर्श देखील आहेत.