शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

महामार्गाच्या दुतर्फा बीजारोपण

By admin | Updated: July 1, 2016 02:59 IST

शुक्रवार १ जुलै या कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे

अलिबाग : शुक्रवार १ जुलै या कृषीदिनी राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे. याच दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या वतीने अत्यंत आगळ््यावेगळ््या ‘गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा बीजारोपण मोहिमेचे’ आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आयोजित या मोहिमेत पाली येथील पालीवाला कॉलेजचे विद्यार्थी उपप्राचार्य प्रा.सुधीर पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली १००० बियांचे रोपण करणार आहेत, तर पोलादपूर येथील एस.एम.कॉलेजचे विद्यार्थी पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावर बीजारोपण करण्याकरिता बिया वाटप करणार असल्याची माहिती शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांनी दिली आहे.विसावा (महाड) येथे १० हजार बियांची उपलब्धता सफर केंद्र व सावली गोशाळेचे संचालक गणराज जैन व अ‍ॅड.अर्चना जैन यांनी केली आहे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबागचे प्रमुख आल्हाद पाटील यांनी तितक्याच बियांची उपलब्धता ठेवली आहे.बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी आठ वाजता विसावा (महाड) येथे महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले व शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पळस्पे (पनवेल) येथे माजी आमदार विवेक पाटील व व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन,खिडकी-अलिबागचे प्रमुख आल्हाद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच वेळी होणार आहे.विसावा (महाड) येथील उपक्रमाकरिता सफर केंद्र आणि सावली गोशाला, आसनपोई-महाड आणि शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड या दोन संस्थांचे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी. पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबाग व भारत पेट्रोलियम वैभव आॅटोमोबाईल्स, पळस्पे-पनवेल या दोन संस्थांचे सहकार्य लाभले आहे.>बियांची नैसर्गिक रुजवात ८० टक्केबीजारोपण ही वृक्ष आणि वन संवर्धनाकरीता अत्यंत शास्त्रशुद्ध आणि प्रभावी प्रक्रीया आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून ही गोवा राष्ट्रीय माहामार्गाच्या दूतर्फा आगळी मोहीम हाती घेण्यात आल्याचे कळल्यावर खरच आनंद वाटला. हि मोहीम वैशिष्ठ्यपूर्ण आहे. बीया एके ठिकाणी रुजवून त्याची लागवड अन्यत्र करणे या प्रक्रीयेमध्ये रोपांची मर्तूक मोठ्या प्रमाणात होते असा आजवरचा अनूभव आहे. परंतू फणस, करंज, जांभूळ, आबा यांच्या बीयाच थेट लावल्या तर त्यांची रुजवात पावसाळ््यात ८० टक्के होते, हे निष्कर्श देखील आहेत.