शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचे दर ४५ टक्क्यांनी वाढले!

By admin | Updated: June 10, 2016 02:08 IST

शेतक-यांवर पुन्हा आर्थिक संकट; मृग नक्षत्रातील पाऊस मात्र दिलासादायक!

राजरत्न सिरसाट/अकोला वळवाच्या पावसानंतर मृग नक्षत्रातील मॉन्सूनपूर्व पावसाने राज्यातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांनी याहीवर्षी सोयाबीन, कापूस पेरणीवर भर दिला आहे. पण, खासगी आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) दर ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढल्याने दुष्काळात आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकर्‍यांसमोर संकट उभे ठाकले आहे.मागील पाच-सहा वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना २0१५-१६ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थिताला सामोरे जावे लागले. उत्पादन आणि उत्पन्नही घटल्याने शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना सवलती देण्यात येतात, बियाण्यांवर अनुदान दिले जाते; ते तर मिळालेच नाही, उलट महाबीज बियाण्यांचे दर ५ ते ३५ टक्के वाढल्याने शेतकर्‍यांवर संकटच कोसळले आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे मागील वर्षी ६२ रुपये किलो होते, ते यावर्षी ६८ रुपये किलो झाले आहे. तूर, मूग, उडिदाचे बियाणे ३५ टक्क्यांनी वाढले आहे. खासगी बाजारात तर हे दर अव्वाच्या सव्वा झाले असून, ३५ ते ४५ टक्के अतिरिक्त दराने शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करावे लागत आहे.बाजारात आजमितीस कडधान्य, तेलवर्गीय धान्य तसेच डाळवर्गीय धान्याचे भाव वाढलेले आहेत. त्याचाच अप्रत्यक्ष परिणाम बियाणे दरावर होत असल्याची सबब महाबीजतर्फे मांडण्यात येत आहे. प्रत्यक्षात महाबीजचे दर निश्‍चित झाल्याशिवाय खासगी कंपन्या त्यांचे दर निश्‍चित करीत नाहीत. महाबीजचे दर घोषित झाल्यानंतर खासगी बाजारातील दर वाढले आहेत. राज्यात २0 लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज आहे. महाबीजने केवळ चार ते साडेचार क्विंटल बियाण्यांची तजवीज केलेली आहे. उर्वरित १६ लाख क्विंटल बियाणे शेतकर्‍यांना बाजारातूनच खरेदी करावे लागणार आहेत. महाबीजने तूर, मूग, उडीद बियाण्यांच्या दरात ३५ टक्क्याच्यावर वाढ केली आहे. खासगी बाजारात हे दर ४५ टक्क्यांपर्यंंत वाढले आहेत. या परिस्थितीत दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांनी दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बीजोत्पादक शेतकर्‍यांना प्रोत्साहन राशी!शेतकर्‍यांच्या शेतावर महाबीजतर्फे बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. त्यामुळे बीजोत्पादक शेतकर्‍यांकडून बियाणे खरेदी करताना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संबंधित धान्याचे दर विचारात घेऊन, त्यावर शेतकर्‍यांना किमान २0 ते २५ टक्क्यापर्यंत प्रोत्साहन राशी देण्यात येत असल्याचे महाबीजकडन स्पष्ट करण्यात येत आहे.