शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा

By admin | Updated: February 10, 2015 00:54 IST

जीवन हे एखाद्या नाण्यासारखे असते. एका बाजूने काहीतरी तुमच्या वाटेला आलेले असते, तर दुसरी बाजू कोरी असते. मात्र जे वाट्याला आले त्याचा विचार करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने

सचिनचा चाहत्यांना सल्ला : मनोहरभाई पटेल जयंती समारंभात विद्यार्थ्यांचा गौरवमनोज ताजने - गोंदियाजीवन हे एखाद्या नाण्यासारखे असते. एका बाजूने काहीतरी तुमच्या वाटेला आलेले असते, तर दुसरी बाजू कोरी असते. मात्र जे वाट्याला आले त्याचा विचार करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकले पाहिजे. ईश्वर तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ‘रिवॉर्ड’ दिल्याशिवाय राहणार नाही, असा मौल्यवान सल्ला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने गोंदियातील युवा वर्गाला दिला.शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि.९) गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या १६ गुणवंत विद्यार्थ्यांना सचिनच्या हस्ते सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले. यावेळी जाहीर प्रकट मुलाखतीदरम्यान सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल तर अतिथी म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिराणी, डॉ. अंजली तेंडुलकर, मंजित हिराणी, प्रख्यात गीतकार, लेखक व कवी प्रसून जोशी, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार, नाना पंचबुद्धे, आ.गोपालदास अग्रवाल, रामरतन राऊत, अनिल बावणकर, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, स्मृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार हरिहरभाई पटेल आदी मंचावर विराजमान होते.यावेळी झालेल्या मुलाखतीत सचिनने देशाच्या प्रगतीसाठी ‘स्वच्छ आणि स्वस्थ भारत’ ही कल्पना साकारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येकाने कार्यक्षम राहण्यासोबतच वर्षातून केवळ एक तास इमानदारीने आवश्यकता असेल तिथे जाऊन स्वच्छता करावी, असे आवाहनही त्याने केले.यावेळी प्रास्ताविक भाषणात खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपले वडील मनोहरभाई पटेल यांनी लावलेल्या गोंदिया शिक्षण संस्थेच्या रोपट्याचा कसा वटवृक्ष झाला, हे सांगून सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाची सोय या दोन्ही जिल्ह्यांत करून दिल्याचे सांगितले. यावेळी इतर पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आ.राजेंद्र जैन यांनी तर आभार प्रदर्शन नरेश माहेश्वरी यांनी केले.तब्बल दोन तास चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान सचिनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले त्याचे चाहते मंत्रमुग्ध झाले होते. गोंदिया-भंडाराच नाही तर इतर जिल्ह्यातून आणि जवळच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातूनही चाहते आले होते. सचिनच्या आगमनापासून तर त्याला ऐकण्यापर्यंत त्याच्या चाहत्यांकडून अधूनमधून ‘सचिन... सचिन...’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार, नाना पंचबुद्धे, आ.गोपालदास अग्रवाल, रामरतन राऊत, अनिल बावणकर, मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, स्मृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार हरिहरभाई पटेल आदी मंचावर विराजमान होते.यावेळी झालेल्या मुलाखतीत सचिनने देशाच्या प्रगतीसाठी ‘स्वच्छ आणि स्वस्थ भारत’ ही कल्पना साकारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येकाने कार्यक्षम राहण्यासोबतच वर्षातून केवळ एक तास इमानदारीने आवश्यकता असेल तिथे जाऊन स्वच्छता करावी, असे आवाहनही त्याने केले.यावेळी प्रास्ताविक भाषणात खा. प्रफुल्ल पटेल यांनी आपले वडील मनोहरभाई पटेल यांनी लावलेल्या गोंदिया शिक्षण संस्थेच्या रोपट्याचा कसा वटवृक्ष झाला, हे सांगून सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाची सोय या दोन्ही जिल्ह्यांत करून दिल्याचे सांगितले. यावेळी इतर पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आ.राजेंद्र जैन यांनी तर आभार प्रदर्शन नरेश माहेश्वरी यांनी केले.तब्बल दोन तास चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान सचिनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले त्याचे चाहते मंत्रमुग्ध झाले होते. गोंदिया-भंडाराच नाही तर इतर जिल्ह्यातून आणि जवळच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातूनही चाहते आले होते. सचिनच्या आगमनापासून तर त्याला ऐकण्यापर्यंत त्याच्या चाहत्यांकडून अधूनमधून ‘सचिन... सचिन...’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. ‘थ्री इडियट’ची शूटिंग गोंदियातच केली असतीयावेळी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी गोंदियाशी जुळलेल्या आपल्या आठवणी सांगताना माझ्या आईचा जन्म गोंदियातील असून लहानपणी मी येथे खेळलो आहे, असे सांगितले. मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर पाहिल्यानंतर हे ठिकाण चित्रपटाची शूटिंग करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. ‘थ्री इडियट’ चित्रपटासाठी हवे तसे कॉलेज मुंबईत सापडले नाही. त्यामुळे बंगलोरला जाऊन शूटिंग करावे लागले. आज गोंदियात आल्यानंतर आपण बंगलोरला विनाकारण गेलो, असे वाटायला लागल्याचे हिराणी म्हणाले.