शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

घरबसल्या बघा साहित्य संमेलन

By admin | Updated: December 31, 2014 00:22 IST

घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मराठी रसिक किती येतील,

पुणे : घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मराठी रसिक किती येतील, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच साहित्यप्रेमींना संगणकाच्या माध्यमातून घरबसल्या या संमेलनाचा आस्वाद घेता येणार आहे. ई-संमेलनाद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे अनावरण मंगळवारी नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ई-संमेलनाविषयीची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भरत देसडला यांनी दिली. ६६६.२ंँ्र३८ं२ेंी’ंल्लॅँ४ेंल्ल.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर घुमानमधील नामदेवांचे कार्य, साहित्य संमेलन, महामंडळ, साहित्य परिषद यांसह आजवरच्या साहित्य संमेलनांचा इतिहास, संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष यांचा संदर्भासहित इतिहास उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वेळी सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य उपस्थित होत्या. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या ‘घुमान’विषयी रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे घुमान व परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती देण्याबरोबरच साहित्य संमेलनासाठी नावनोंदणी, नोंदणीचे अर्ज, नियम व अटी, संपर्कासाठी माहिती, सरहद व महामंडळ कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक यांचाही समावेश संकेतस्थळावर करण्यात आला आहे.४अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संमेलनाचे जाळे जगभरात पोहोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे. याशिवाय लॅपटॉप, मोबाईल, टॅब आदी माध्यमातून ई-संमेलन रसिकांना पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे भरत देसडला यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावहारिक कारणांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध होत होता. मात्र नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा विधायक कामांसाठी झाला पाहिजे ही गोष्ट घुमान संमेलनाने दाखवून दिली आहे. १६व्या शतकातले संत नामदेव आणि २१वे आधुनिक शतक परंपरा आणि आधुनिकतेचा उत्तम मिलाफ संमेलनात पाहायला मिळत आहे. एकमेकांना शह-प्रतिशह देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. - डॉ. सदानंद मोरे, नियोजित संमेलनाध्यक्ष