शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतीकडे व्यवसाय म्हणून पहा - जैन

By admin | Updated: August 23, 2015 00:34 IST

कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या

मुंबई : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या प्रयोगांकडे लक्ष द्यावे आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे, असे आवाहन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले.परेल येथील आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनिल जैन बोलत होते. ते म्हणाले की, गरिबीमुळे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होते आहे. शिवाय अनियमित पावसामुळे कृषी क्षेत्रावर संकट आले आहे. परिणामी शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान होते आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी वर्गाने ठिबक सिंचन राबविले पाहिजे. कारण ठिबक सिंचनामुळे पाण्याची ६५ टक्के बचत होते. आणि त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होतो.विशेष म्हणजे ओनर प्रोफेशनल आॅन लाईन पद्धतीने शेती केली आणि राईट प्रॅक्टीस टेक्नोलॉजीचा वापर केला तर उत्तम फायदा होऊ शकतो. आम्ही असेच तंत्रज्ञान शेतकरी वर्गासमोर सादर करत असून, छोटे शेतकरी कसे फायद्यात येतील, यावर आमचा भर आहे. शिवाय ऊस, कापूस आणि केळी यासारखी उत्पादने वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याबाबतची जनजागृती अधिक व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांची मदत घेत आहोत. सहा शाळांतील आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शेती कशी करावी, त्याकडे कसे वळावे याबाबतचे मार्गदर्शन केले जाते आहे. कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान कसे वापरता येईल, याबाबतची माहिती दिली जात आहे.केवळ शेतीसाठी शेती नाही तर एक व्यवसाय म्हणून उभारीला यावा, हा उद्देश आहे. शिवाय शेतकरी वर्गाला मदतीसाठी कंपनीने अडीच हजार एकर जागेवर कृषी क्षेत्रातील निरनिराळे प्रयोग सुरु केले आहेत. आणि त्या माध्यमातून कृृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम सुरु आहे. तसेच विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांसोबत कृषी क्षेत्राला वाव देण्यासाठी कार्य सुरु असल्याचेही जैन यांनी आर्वजून नमुद केले. (प्रतिनिधी)