शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शेतीकडे व्यवसाय म्हणून पहा - जैन

By admin | Updated: August 23, 2015 00:34 IST

कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या

मुंबई : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या प्रयोगांकडे लक्ष द्यावे आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे, असे आवाहन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले.परेल येथील आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनिल जैन बोलत होते. ते म्हणाले की, गरिबीमुळे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होते आहे. शिवाय अनियमित पावसामुळे कृषी क्षेत्रावर संकट आले आहे. परिणामी शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान होते आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी वर्गाने ठिबक सिंचन राबविले पाहिजे. कारण ठिबक सिंचनामुळे पाण्याची ६५ टक्के बचत होते. आणि त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होतो.विशेष म्हणजे ओनर प्रोफेशनल आॅन लाईन पद्धतीने शेती केली आणि राईट प्रॅक्टीस टेक्नोलॉजीचा वापर केला तर उत्तम फायदा होऊ शकतो. आम्ही असेच तंत्रज्ञान शेतकरी वर्गासमोर सादर करत असून, छोटे शेतकरी कसे फायद्यात येतील, यावर आमचा भर आहे. शिवाय ऊस, कापूस आणि केळी यासारखी उत्पादने वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याबाबतची जनजागृती अधिक व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांची मदत घेत आहोत. सहा शाळांतील आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शेती कशी करावी, त्याकडे कसे वळावे याबाबतचे मार्गदर्शन केले जाते आहे. कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान कसे वापरता येईल, याबाबतची माहिती दिली जात आहे.केवळ शेतीसाठी शेती नाही तर एक व्यवसाय म्हणून उभारीला यावा, हा उद्देश आहे. शिवाय शेतकरी वर्गाला मदतीसाठी कंपनीने अडीच हजार एकर जागेवर कृषी क्षेत्रातील निरनिराळे प्रयोग सुरु केले आहेत. आणि त्या माध्यमातून कृृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम सुरु आहे. तसेच विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांसोबत कृषी क्षेत्राला वाव देण्यासाठी कार्य सुरु असल्याचेही जैन यांनी आर्वजून नमुद केले. (प्रतिनिधी)