शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

अडचणींकडे ‘चॅलेंज’म्हणून बघा

By admin | Updated: August 11, 2014 00:57 IST

श्यामच्या आईसारखे झालेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. वर्धा येथे असताना गांधी, विनोबांच्या विचारांचा सहवास. मेडिकलच्या पदवीनंतर बैरागडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

कोल्हे दाम्पत्याच्या भावना : बैरागडमधील आठवणींना प्रगट मुलाखतीतून उजाळानागपूर : श्यामच्या आईसारखे झालेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. वर्धा येथे असताना गांधी, विनोबांच्या विचारांचा सहवास. मेडिकलच्या पदवीनंतर बैरागडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. असंख्य अडचणीतून मार्ग काढत कार्य सुरू ठेवले. परिस्थितीशी दोन हात करून अडचणींकडे ‘चॅलेंज’ म्हणून बघितले की यश नक्कीच तुमच्या पदरात पडते, अशा शब्दात मेळघाटच्या बैरागडमध्ये २९ वर्षांपासूून अविरत सेवा देणाऱ्या डॉ. स्मिता आणि रवींद्र कोल्हे यांनी आपल्या भावना मांडल्या.प्रयास-सेवांकुर अमरावती, मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट आणि स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘आम्ही बिघडलो! तुम्ही बी घडाना’ कार्यक्रमात डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांची मृणालिनी चितळे व अविनाश सावजी यांनी द ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या मुंडले सभागृहात प्रगट मुलाखत घेतली. डॉ. कोल्हे म्हणाले, मेळघाटातील बैरागड येथे काम करण्याचा निर्णय घेऊन ३ हजार ५०० रुपये घेऊन तेथे गेलो. मित्र, नातेवाईक, स्थानिकांनी मदत केली. तापी धरणामुळे तेथील पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला. धरणाबाबत प्रशासनाने आदिवासींना इंग्रजीत नोटीस पाठविली. त्याची कॅसेट तयार करून गावोगाव ऐकविली आणि शासनाशी लढा दिला. लढ्याला यश येऊन धरणाचा निर्णय रद्द झाला. पत्नी डॉ. स्मितावर प्राणघातक हल्ला झाला. कुपोषणाच्या प्रश्नावर शासनाशी खडाजंगी केली. तेथील अंधश्रद्धा दूर करून मंत्रांनी नव्हे तर वैद्यकीय उपचारामुळे आजार दूर होतात हे ठासून सांगितले. मेळघाटात तरुणांची गरज आहे. तेथील लोक शिक्षित झाल्यास त्यांचे सर्व प्रश्न सुटतील. डॉ. स्मिता कोल्हे यांनी आपल्या लग्नाबाबत मजेशीर माहिती देऊन उपस्थितांना हास्यसागरात बुडविले. त्या म्हणाल्या, रविंद्र कोल्हे यांनी लग्नासाठी अटी घातल्या. दररोज ४० किलोमीटर चालावे लागेल, दुसऱ्यासाठी भिक मागावी लागेल, ४०० रुपयात घर चालवावे लागेल, या त्या अटी होत्या.त्यांच्या अटींना मान्य करून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा निर्णय घेतला आणि आजपर्यंत वाटचाल सुरू आहे. व्यासपीठावर उपस्थित डॉ. गिरीश गांधी, डॉ. विलास डांगरे, अविनाश सावजी, निखील मुंडले, नरेश सब्जीवाले, बाबासाहेब वरणगावकर, पंकज महाजन यांच्या हस्ते मृणालिनी चितळे लिखित ‘मेळघाटावरील मोहर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)