शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्रलंबित मागण्यांसाठी सुरक्षारक्षकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटना; उद्यापासून आझाद मैदानात एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध आस्थापनांत काम करणाऱ्या खासगी सुरक्षारक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेने येत्या मंगळवार, दिनांक ५ जानेवारीपासून  आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.‘सुरक्षारक्षकांच्या समस्या आम्ही वेळोवेळी शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असून, दर वेळी आश्वासनांपलीकडे प्रकरण जातच नाही. वेतनवाढ प्रलंबित आहे, सुरक्षारक्षकांच्या पगारातून कापून घेतलेल्या रकमेचा भरणा भविष्य निर्वाह निधीत न होता, ती रक्कम दुसरीकडेच वळवली जाते, राज्यातील खासगी सुरक्षारक्षकांच्या नोकरीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक अधिनियमन १९८१ कायदा लागू करण्यात आलापण, त्याची नीट अंमलबजावणी होत नाही. म्हणून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी सोनावणे यांनी ‘लोकमत’ला दिली.गेल्या  दिनांक १६ डिसेंबर रोजी संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री, कामगार प्रधान सचिव व कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. राज्यातील १५ सुरक्षारक्षक मंडळे एकत्र करावीत, सर्व सुरक्षारक्षकांना लष्कराप्रमाणे एकच गणवेष देण्यात यावा, सुरक्षारक्षकांचा जमवलेला निधी भविष्य निर्वाह निधीतच जमा करण्यात यावा, शासनाच्या समितीवर उच्च शिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, सुरक्षारक्षकांच्या नावापुढील ‘टेम्पररी’ हा शब्द काढून त्यांना कायमस्वरूपी नोदणी क्रमांक देण्यात यावा, सर्व मंडळांतील प्रतीक्षा यादी संपुष्टात आणावी आणि ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांचे थकीत वेतन तत्काळ देण्यात यावे, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

परस्पर भरती केल्याचा आरोप सर्वच ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक मंडळातर्फे सुरक्षारक्षक तैनात केले जात नाहीत. मंडळाकडे मुंबई व ठाण्यात जवळजवळ ३२०० आस्थापनांची नोंद आहे. मात्र, यातील बऱ्याच आस्थापनांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून सुरक्षारक्षकांची परस्पर भरती केल्याचा आरोप अश्विनी सोनावणे यांनी केला.