शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरात रंगले दुसरे गोल रिंगण

By admin | Updated: June 28, 2017 01:42 IST

आभाळाला साक्षी ठेवत मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर (जि. पुणे) : आभाळाला साक्षी ठेवत मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या मैदानात संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचा अश्व रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पांढऱ्या ढगांमध्ये काळ्या ढगांची झालेली पेरणी, हवेत बराचसा उष्मा, सभोवार भाविकांची गर्दी आणि भुईवरच्या लाल मातीत खुरांचे ठसे उमटवत वाऱ्याच्या वेगाने दौडणारे दोन कृष्णरंगी अश्व, सभोवती फडफडणाऱ्या पताका... ग्यानबा-तुकारामाचा अखंडित उद्घोष, साथीला टाळ-चिपळ्या व मृदंगाची भक्तिभावाला साद घालणारी लय. अशा मंतरलेल्या वातावरणात हे तालुक्यातील दुसरे अश्वरिंगण रंगले.सकाळी साडेअकराच्या सुमारास इंदापूर बारामती रस्त्याने प्रथमत: संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीच्या नगारखान्याचे रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आगमन झाले. सव्वाबारा वाजता पालखीचा रथ आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, आदींनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखीचा रथ रिंगणातून फिरवण्यात आला. हर्षवर्धन पाटील यांनी रथाचे सारथ्य केले. पूजा झाल्यानंतर प्रत्यक्षात रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम झेंडेकरी, त्यानंतर तुळशीवाल्या महिलांची दौड झाली. त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्वरिंगणाचा सोहळा झाला. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात आणण्यात आली. तेथे पालखीच्या दर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटल्याचे चित्र दिसत होते.निळोबाराय पालखी पहिल्यांदाच वारीतहजारो भाविकांची मांदियाळी, फुलांचा वर्षाव आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर संत निळोबाराय यांनी रचलेल्या अभंगाची कवने सादर केल्याने झालेले भक्तीमय वातावरण आणि फुलांचा वर्षाव व दोन्ही संतांच्या पादुका एकाच ठिकाणी आल्यावर ‘एकोबा, तुकोबा, निळोबा’ च्या रंगलेल्या जयघोषात संत तुकाराम महाराज व संत निळोबाराय यांच्या पालखीचा भेटीचा ऐतिहासिक सोहळा इंदापुरात रंगला़ संत परंपरेतील शेवटचे संत समजले जाणारे संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळयाचा इतिहासात पहिल्यांदाच वारीत समावेश झाला आहे़ जगदगुरू संत तुकाराम महाराज यांना गुरू मानून निळोबा गाथा लिहिणाऱ्या संत निळोबारायांनी श्री क्षेत्र पिंपळनेर येथे समाधी घेतली.