शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाणी एक्सप्रेसची दुसरी फेरी

By admin | Updated: April 14, 2016 08:36 IST

दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या लातूररमध्ये पाणी एक्सप्रेसने दूसरी फेरी पूर्ण केली आहे. बुधवारी रात्री पाच लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली.

ऑनलाइन लोकमत 

लातूर, दि. १४ - दुष्काळ आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या लातूररमध्ये पाणी एक्सप्रेसने दूसरी फेरी पूर्ण केली आहे. बुधवारी रात्री पाच लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये दाखल झाली. १० वॅगन असलेली पाणी एक्सप्रेस बुधवारी सकाळी मिरजहून निघाली होती. ३५० किमीचे अंतर पार करुन दहा तासांनी पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये पोहोचली. 
 
प्रत्येक वॅगनमध्ये ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्थानकात या सर्व वॅगनमध्ये पाणी भरण्यात आले होते. मंगळवारी पहिली पाणी एक्सप्रेस लातूरमध्ये पोहोचली होती. ट्रेनमधून येणारे पाणी साठवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लातूर रेल्वे स्थानकाजवळची एक मोठी विहीर ताब्यात घेतली आहे. 
 
लातूरसाठी ही विशेष रेल्वे गाडी आठ एप्रिलला राजस्थानातील कोटा येथून निघाली होती. दुष्काळग्रस्त लातूरमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी ५० वॅगन असलेल्या दोन मालवाहतुकीच्या ट्रेन्स उपलब्ध करुन देण्याचे कोटा वर्कशॉपला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. या विशेष ट्रेनच्या प्रत्येक वॅगनमध्ये ५४ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.