शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा

By admin | Updated: January 14, 2015 00:13 IST

ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न

अकोला: महावितरणच्या वतीने गत दोन वर्षांमध्ये पायाभूत सुविधा आराखडा राबविण्यात आला. या उपक्रमाचा पहिला टप्पा डिसेंबर २0१४ मध्ये संपला, तर जानेवारी २0१५ पासून दुसर्‍या टप्प्याला सुरूवात झाली. ग्राहकांना चांगल्या दर्जाची, व्यवस्थित सेवा मिळावी, यासाठी जानेवारी २0१५ पासून पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. महावितरणने आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात वितरण यंत्रणेचे बळकटीकरण केले. यादरम्यान पुर्नरचित गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रम (आयआरडीपी) राबविण्यात आला. या योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे ग्राहकांना दिल्या जाणार्‍या सेवांची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली. याशिवाय वीज हानीवर आधारीत भारनियमनाचा फॉर्म्युला महावितरणने अंमलात आणला. वितरण हानी आटोक्यात आणली, गावठाण फिडर सेपरेशन योजना आणि सिंगल फेजिंग योजनेव्दारे भारनियमनाचे प्रभावी व्यवस्थापन केले. गत पाच वर्षात महाराष्ट्रात १0 लाखांपेक्षा जास्त कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या. पायाभूत आराखडा अंतर्गत राज्यात वीज वितरण हानी कमी करणे, ग्राहकांना ऑनलाईन सुविधा पुरविणे, यासाठी महावितरणने अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे विविध उपाययोजना केल्या. पहिला टप्पा संपल्यानंतर जानेवारी २0१५ मध्ये दुसर्‍या टप्प्याला सुरूवात होणार आहे. यामध्ये स्थिरता आणि विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच इन्फ्रारेड मीटर, प्रीपेड मीटर जास्तीत जास्त प्रमाणात देण्यावर भर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राबविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.*वीजपुरवठय़ाकडे लक्ष पायाभूत आराखड्यानुसार आगामी वर्षात जास्तीत जास्त ग्राहकांना वीज पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. महावितरणचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत असून, विजेची मागणीही वाढत आहे. त्यानुसार वीजपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे. महावितरणने ५ ऑक्टोबर २0१४ रोजी तब्बल ३६४.५७ दशलक्ष युनीट वीज पुरवठा करण्याचा विक्रम केला होता. तत्पूर्वी २९ सप्टेंबर २0१४ रोजी महावितरणने ३६२ दशलक्ष युनीट वीज पुरविली होती. यावर्षी वीज पुरवठय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.