शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

महावितरणच्या पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा

By admin | Updated: January 14, 2015 00:13 IST

ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न

अकोला: महावितरणच्या वतीने गत दोन वर्षांमध्ये पायाभूत सुविधा आराखडा राबविण्यात आला. या उपक्रमाचा पहिला टप्पा डिसेंबर २0१४ मध्ये संपला, तर जानेवारी २0१५ पासून दुसर्‍या टप्प्याला सुरूवात झाली. ग्राहकांना चांगल्या दर्जाची, व्यवस्थित सेवा मिळावी, यासाठी जानेवारी २0१५ पासून पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. महावितरणने आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात वितरण यंत्रणेचे बळकटीकरण केले. यादरम्यान पुर्नरचित गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रम (आयआरडीपी) राबविण्यात आला. या योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे ग्राहकांना दिल्या जाणार्‍या सेवांची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली. याशिवाय वीज हानीवर आधारीत भारनियमनाचा फॉर्म्युला महावितरणने अंमलात आणला. वितरण हानी आटोक्यात आणली, गावठाण फिडर सेपरेशन योजना आणि सिंगल फेजिंग योजनेव्दारे भारनियमनाचे प्रभावी व्यवस्थापन केले. गत पाच वर्षात महाराष्ट्रात १0 लाखांपेक्षा जास्त कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या. पायाभूत आराखडा अंतर्गत राज्यात वीज वितरण हानी कमी करणे, ग्राहकांना ऑनलाईन सुविधा पुरविणे, यासाठी महावितरणने अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे विविध उपाययोजना केल्या. पहिला टप्पा संपल्यानंतर जानेवारी २0१५ मध्ये दुसर्‍या टप्प्याला सुरूवात होणार आहे. यामध्ये स्थिरता आणि विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच इन्फ्रारेड मीटर, प्रीपेड मीटर जास्तीत जास्त प्रमाणात देण्यावर भर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राबविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.*वीजपुरवठय़ाकडे लक्ष पायाभूत आराखड्यानुसार आगामी वर्षात जास्तीत जास्त ग्राहकांना वीज पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. महावितरणचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत असून, विजेची मागणीही वाढत आहे. त्यानुसार वीजपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे. महावितरणने ५ ऑक्टोबर २0१४ रोजी तब्बल ३६४.५७ दशलक्ष युनीट वीज पुरवठा करण्याचा विक्रम केला होता. तत्पूर्वी २९ सप्टेंबर २0१४ रोजी महावितरणने ३६२ दशलक्ष युनीट वीज पुरविली होती. यावर्षी वीज पुरवठय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.