शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

दुसरीही मुलगी झाली म्हणून टपालाने पाठविला ‘तलाक’

By admin | Updated: April 20, 2017 05:25 IST

तिहेरी तलाक पद्धतीचा मुद्दा देशभरात गाजत आहे. ही पद्धत बंद करण्याला नरेंद्र मोदी सरकारने पाठिंबा दर्शविला.....

नागपूर : तिहेरी तलाक पद्धतीचा मुद्दा देशभरात गाजत आहे. ही पद्धत बंद करण्याला नरेंद्र मोदी ेसरकारने पाठिंबा दर्शविला असतानाच नागपुरातील एका महिलेला तिच्या पतीने टपालाने ‘तलाक’ दिला आहे. अशा अनपेक्षित तलाकमुळे स्वत:चा व दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करावा, असा गहन प्रश्न या महिलेपुढे उभा ठाकला आहे. तिने या एकतर्फी निर्णयाविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.नांदेड जिल्ह्यातील परतूर येथे पोलीस दलात असलेल्या मो.अकिल मो.इस्माईल शेख (३६) याने २०१३मध्ये पहिल्या पत्नीला तलाक दिल्यानंतर दुसरा विवाह केला. सुरुवातीला तीन महिने त्यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. नंतर दुसऱ्या पत्नीला दिवस गेले; पण पतीला मूल नको होते. यावरून सासरच्या लोकांकडून छळ सुरू झाला. यातच तिला एक दिवस माहेरी सोडण्यात आले. मुलीला जन्म दिल्यानंतर नवरा न्यायला आला नाही. त्यामुळे तिच्या आईने तिला सासरी नेऊन सोडले. त्यानंतरही पती व सासरच्या लोकांचा जाच सुरूच होता.ही महिला सांगते, पोलिसांत असल्याचे सांगत पतीकडून वारंवार ‘तलाक’ देण्याची धमकी मिळत होती. तीन वर्षांच्या मुलीसह मला घरात कोंडले जात होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये परतूर येथे पतीसोबत आले. पण सात महिन्यांची गर्भवती असताना माहेरी सोडण्यात आले. मला दुसरी मुलगी झाली. मुलगी तीन महिन्यांची झाली तरी पती घ्यायला आला नाही. एवढेच नव्हे तर, नको ते आरोप करून मला ११ एप्रिल रोजी टपालाद्वारे तलाक पाठविला. माझा कोणताही दोष नसताना व मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी तलाक पाठविण्यात आल्याचे या महिलेने सांगितले.पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. मला तलाक मंजूर नाही. मुलींचा उदरनिर्वाह करण्यासाठी साधन नसल्याने मला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.