शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

भाजपा मतांमध्ये दुसऱ्या स्थानावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 03:38 IST

ठाणे महापालिकेच्या सातव्या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर कब्जा मिळवून शिवसेनेने पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळविले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सातव्या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर कब्जा मिळवून शिवसेनेने पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यांना तब्बल १० लाख ७ हजार ५१६ मतदारांचा जनाधार मिळाला आहे. भाजपाला २३ जागा मिळाल्या. परंतु मतांच्या आकडेवारीनुसार ते दुसऱ्या स्थानावर आहेत, तर ३४ जागा मिळविणारा राष्ट्रवादी काँग्रेस मतांच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या स्थानी आहे. भाजपाला या निवडणुकीत चार उमेदवारांचे मिळून तब्बल ७ लाख १५ हजार मते मिळाली असून त्यांच्या तुलनेत ३४ जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादीला ४ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवूनही भाजपा तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. परंतु ठाण्यात भाजपा आणि राष्ट्रवादीला समाधानकारक मजल मारण्यात यश आले असले तरी देखील पूर्वीचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याने कॉंग्रेसच्या पारड्यात मात्र अपयश टाकले असून मनसेची देखील २०१२ च्या तुलनेत यंदा मतांची चांगलीच घसरण झाली आहे. महापालिका निवडणुकीत २५ पक्षांचे तब्बल ८०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पैकी शिवसेनेने आपले ११९ मावळे रिंगणात उतरविले होते. या मावळ्यांना महापालिका हद्दीतील १० लाख ७ हजार ५१६ मतदात्यांचा जनाधार मिळाला आहे. एकूणच त्यांच्या प्रत्येक उमेदवारांच्या सरासरी मतांची संख्या ही ८ हजार ४६६ इतकी असल्याची माहिती नुकत्याच सादर झालेल्या मतांच्या एकूण आकडेवारीवरुन दिसत आहे. एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार होता. त्यानुसार जर ठाणेकरांच्या पाठिंब्याची आकडेवारी मांडली तर मतदान करणाऱ्या सव्वा सहा लाख ठाणेकरांपैकी २ लाख ५१ हजार ठाणेकरांनी शिवसेनेला पसंती दिली आहे. त्या खालोखाल १ लाख ७८ हजार ठाणेकरांनी भाजपला मिळाली आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेबरोबर युतीत लढली होती. त्यावेळेस केवळ आठ ठिकाणी त्यांनी विजय संपादीत केला होता. त्यांना केवळ ३१ हजार ४९२ ठाणेकरांनी पसंती दिली होती. मात्र, यंदा युती तुटली आणि विधानसभेप्रमाणेच ठाण्यातही भाजपा स्वबळावर लढली आणि या ठिकाणी त्यांनी १२० शिलेदार उभे केले होते. या शिलेदारांना ठाणेकरांनी पसंती मोहर दर्शवत लाखोंची मते त्यांच्या पदरात टाकली आहेत. २०१२ च्या तुलनेत त्यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांच्या तुलनेतही जास्तीची आहे. (प्रतिनिधी)>सरासरी मतसंख्या २६२६महापालिका निवडणुकीत १ लाख १५ हजार ठाणेकरांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. कॉग्रेसचा या निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांच्या ५३ उमेदवारांना १ लाख ३९ हजार मते मिळाली आहेत. ३४ हजार ७९४ ठाणेकरांचा त्यांना पाठिंबा असून त्यांच्या ५३ उमेदवारांची सरासरी मतसंख्या २६२६ इतकी आहे. त्यापैकी फक्त तीन उमेदवारांना विजय नोंदविता आला आहे. त्यात मनसेचे ९९ उमेदवार रिंगणात होते. मात्र, त्यापैकी एकालाही विजय नोंदविता आला नसला तरी देखील मनसेला १ लाख ५७ हजार ५७४ मते मिळाली असून ३९ हजार ठाणेकरांच्या पाठिंब्यासह त्यांच्या उमेदवारांची सरासरी मते फक्त १५९१ इतकी होत आहेत.