शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

वाळीतग्रस्तांवर दुसऱ्यांदा हल्ला

By admin | Updated: April 13, 2015 11:38 IST

मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील वाळीतग्रस्त हरिदास बाणकोटकर यांना गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा वाजता त्यांच्या घरासमोरच गावातील जमावाने

अलिबाग : मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील वाळीतग्रस्त हरिदास बाणकोटकर यांना गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा वाजता त्यांच्या घरासमोरच गावातील जमावाने प्राणघातक हल्ल्या केला. तर त्यांच्या मोटारसायकलवर दगड टाकून ती संपूर्ण मोडतोड केल्याप्रकरणी राजपुरी कोळीवाड्यातील अकरा ग्रामस्थांवर मुरुड पोलिसांंनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे दुस-यांदा हल्ला झाल्याने वाळीतग्रस्तांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या या अकरा हल्लेखोर ग्रामस्थांमध्ये प्रलय आंबटकर, मंगेश कुणबी, प्रसाद आंबटकर, कृष्णा चव्हाण, जेमिनी आंबटकर, हिरकणी गिदी, चंद्रकांत चव्हाण, नारायण चव्हाण, जगदीश चव्हाण, रतन चव्हाण, प्रमोदिनी चव्हाण यांचा समावेश आहे. बाणकोटकर कुटुंबावर पहिला प्राणघातक हल्ला ८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता राजपुरी कोळीवाड्यातील प्रमुख पंचवीस स्त्री-पुरुषांंच्या समूहाने केला. समुद्र किनारी असलेली त्याची चहाची टपरी व झोपडी पूर्णपणे तोडून टाकली. या साऱ्या प्रकारास विरोध करण्यासाठी पुढे आलेल्या हरिदास बाणकोटकर, त्यांच्या पत्नी गीता बाणकोटकर यांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली.या प्रकरणी मुरुड पंचायत समितीच्या माजी सभापती नीता विजय गिदी, राजपुरी महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना गिदी, राजपुरी पोलीस पाटील यांच्या पत्नी रुपलता आंबटकर, राजपुरीच्या सरपंच हिरकणी गिदी, नारायण चव्हाण, विठा चव्हाण, ताई गिदी, देवकी आगरकर, निना मालीम, पदमू खरसईकर, जनाबाई चव्हाण, सुनंदा घागरी या बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांची तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्यासमोर समज देऊन बंधपत्रावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान पुन्हा एकदा जमावाकडून बाणकोटकर कुटुंबियांवर हल्ला करण्यात आल्याने येथील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. यामुळे २००९ पासून वाळीत टाकण्यात आलेल्या मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास बाणकोटकर यांच्या पत्नी गीता बाणकोटकर, आठवीत शिकणारी मुलगी रिया, चौथीत शिकणारा मुलगा आकाश, बालवाडीत असलेला गणराज व दीड वर्षाचा रिष अशा सहाजणांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. (विशेष प्रतिनिधी)