शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

आघाडीवर शिक्कामोर्तब!

By admin | Updated: August 7, 2014 02:44 IST

स्वबळावर लढण्याची भाषा करून महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण तयार करू पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस अखेर आगामी विधानसभा काँग्रेससोबतच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोनिया गांधी-पवार यांची चर्चा
जागावाटप मुंबईतच होणार, गुंते दिल्लीत सोडवू
समविचारी पक्षांना आघाडीत सहभागी करणार
 
नवी दिल्ली : स्वबळावर लढण्याची भाषा करून महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण तयार   करू पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस अखेर आगामी विधानसभा काँग्रेससोबतच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 144 जागांचा हट्ट सोडत बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि आघाडीवर शिक्कामोर्तब केले. जागावाटपाची प्राथमिक चर्चा राज्यात करावी आणि ज्या जागांवर तिथे तडजोड होणार नाही, तो गुंता राजधानीत सोडवावा, असे ठरले. 
सूत्रंनी सांगितले, पवार यांनी सोनिया गांधी यांना सांगितले, आम्ही ज्या 14क् जागांची अपेक्षा ठेवली आहे, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस 125 ते 13क् जागांवर बलाढय़ आहे, तर त्यातीलच 13 ते 15 जागांवर काँग्रेसची ताकद कमी आहे. त्या जागांची काळजी घ्यावी लागेल. काही समविचारी पक्षांना आघाडीत सहभागी करून घेतले तर, त्यांचा फायदा दोघांनाही होईल. मात्र, हा मुद्दा काँग्रेसला मान्य नाही असे नाही, पण त्यांना द्यायच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून द्याव्या, असे लागलीच काँग्रेसने स्पष्ट केले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी लोकमतला सांगितले,  आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. कोणताही संभ्रम यापुढे राहणार नाही. जागावाटपाबाबतची चर्चा मुंबईत होईल, ज्या जागांबाबत एकमत होणार नाही, ते मुद्दे दिल्लीत सुटतील. (विशेष प्रतिनिधी)
 
विधानसभा निवडणूक आघाडी करून लढू, असा प्रस्ताव देऊन कोणत्याही स्थितीत स्वबळाची भाषा आता होणार नाही, असे अभिवचन पवार यांनी सोनिया गांधी यांना दिले. समविचारी पक्षांना आपल्या आघाडीत सहभागी करून घेतल्यास त्याचा फायदा होईल, अशी भूमिकाही त्यांनी 1क् जनपथवर मांडली. 
 
राष्ट्रवादीच्या धमकीमुळे भेटीला महत्त्व
1क् जनपथ या सोनिया यांच्या निवासस्थानी पवार यांनी त्यांची सकाळी 1क् वाजता भेट घेतली. तब्बल 4क् मिनिटे ही चर्चा झाली. राज्यातील जागावाटपाबाबत 5क् टक्क्यांचे सूत्र काँग्रेस मान्य करत नसेल, तर आम्ही स्वतंत्रपणो लढायला मोकळे आहोत, अशी थेट धमकीच गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला दिली होती़ त्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या भेटीला राजधानीत महत्त्व प्राप्त झाले होते. 
 
प्रस्थापित मंत्र्यांविरुद्ध ‘स्वाभिमानी’ला लढू द्या
पुणो :  विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रस्थापित आठ मंत्र्यांचे मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. ही संघटना अवास्तव जागा मागत असल्याचा अपप्रचार सुरू आहे. गेल्या निवडणुकीत 38 पैकी 16 जागांवर सेना-भाजपाचे उमेदवार तिस:या क्रमांकावर होते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.