शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीवर शिक्कामोर्तब!

By admin | Updated: August 7, 2014 02:44 IST

स्वबळावर लढण्याची भाषा करून महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण तयार करू पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस अखेर आगामी विधानसभा काँग्रेससोबतच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोनिया गांधी-पवार यांची चर्चा
जागावाटप मुंबईतच होणार, गुंते दिल्लीत सोडवू
समविचारी पक्षांना आघाडीत सहभागी करणार
 
नवी दिल्ली : स्वबळावर लढण्याची भाषा करून महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण तयार   करू पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस अखेर आगामी विधानसभा काँग्रेससोबतच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 144 जागांचा हट्ट सोडत बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि आघाडीवर शिक्कामोर्तब केले. जागावाटपाची प्राथमिक चर्चा राज्यात करावी आणि ज्या जागांवर तिथे तडजोड होणार नाही, तो गुंता राजधानीत सोडवावा, असे ठरले. 
सूत्रंनी सांगितले, पवार यांनी सोनिया गांधी यांना सांगितले, आम्ही ज्या 14क् जागांची अपेक्षा ठेवली आहे, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस 125 ते 13क् जागांवर बलाढय़ आहे, तर त्यातीलच 13 ते 15 जागांवर काँग्रेसची ताकद कमी आहे. त्या जागांची काळजी घ्यावी लागेल. काही समविचारी पक्षांना आघाडीत सहभागी करून घेतले तर, त्यांचा फायदा दोघांनाही होईल. मात्र, हा मुद्दा काँग्रेसला मान्य नाही असे नाही, पण त्यांना द्यायच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून द्याव्या, असे लागलीच काँग्रेसने स्पष्ट केले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी लोकमतला सांगितले,  आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. कोणताही संभ्रम यापुढे राहणार नाही. जागावाटपाबाबतची चर्चा मुंबईत होईल, ज्या जागांबाबत एकमत होणार नाही, ते मुद्दे दिल्लीत सुटतील. (विशेष प्रतिनिधी)
 
विधानसभा निवडणूक आघाडी करून लढू, असा प्रस्ताव देऊन कोणत्याही स्थितीत स्वबळाची भाषा आता होणार नाही, असे अभिवचन पवार यांनी सोनिया गांधी यांना दिले. समविचारी पक्षांना आपल्या आघाडीत सहभागी करून घेतल्यास त्याचा फायदा होईल, अशी भूमिकाही त्यांनी 1क् जनपथवर मांडली. 
 
राष्ट्रवादीच्या धमकीमुळे भेटीला महत्त्व
1क् जनपथ या सोनिया यांच्या निवासस्थानी पवार यांनी त्यांची सकाळी 1क् वाजता भेट घेतली. तब्बल 4क् मिनिटे ही चर्चा झाली. राज्यातील जागावाटपाबाबत 5क् टक्क्यांचे सूत्र काँग्रेस मान्य करत नसेल, तर आम्ही स्वतंत्रपणो लढायला मोकळे आहोत, अशी थेट धमकीच गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला दिली होती़ त्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या भेटीला राजधानीत महत्त्व प्राप्त झाले होते. 
 
प्रस्थापित मंत्र्यांविरुद्ध ‘स्वाभिमानी’ला लढू द्या
पुणो :  विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रस्थापित आठ मंत्र्यांचे मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. ही संघटना अवास्तव जागा मागत असल्याचा अपप्रचार सुरू आहे. गेल्या निवडणुकीत 38 पैकी 16 जागांवर सेना-भाजपाचे उमेदवार तिस:या क्रमांकावर होते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.